खरीप गेला, आता भिस्त रब्बी हंगामावर
खरीप गेला, आता भिस्त रब्बी हंगामावर  
मुख्य बातम्या

खरीप गेला, आता भिस्त रब्बी हंगामावर

टीम अॅग्रोवन

तऱ्हाडी, जि. धुळे : गेल्या महिन्यात अतिवृष्टीने खरीप हंगामाचे प्रचंड नुकसान झाले असून, खरीप हंगाम हातून गेला आहे. त्यामुळे आता रब्बी हंगामावर भिस्त आहे. शेतीची मशागत करून तऱ्हाडीसह शिरपूर तालुक्यात रब्बीच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांचा हरभरा व गहू पिकाकडे कल असून, हरभरा व गहू लागवड क्षेत्रामध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ऐन काढणीच्या हंगामात खरीप हंगामाच्या पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला. त्यात कापूस, बाजरी, मूग, कांदे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यापाठोपाठ परतीच्या पावसाने उडीद, मठ, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. आता पावसाने उघडीप दिल्याने थंडीची चाहूल लागली असून, रब्बी पेरणीयोग्य वातावरण निर्माण झाले आहे. सततच्या पावसामुळे जमिनीत ओलावा जास्त प्रमाणात असल्याने मोठ्या प्रमाणात तण वाढले असून, त्यामुळे शेतकरी तणनाशक फवारून व ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीची मशागत करण्याचे काम दिवस-रात्र सुरू आहे. काही ठिकाणी पेरणीयोग्य झालेल्या क्षेत्रामध्ये हरभरा व गहू पेरणीला सुरवात झाली असून, यंदा भरपूर पाऊस झाल्यामुळे कूपनलिका व विहिरी यांच्यात पाणीसाठा मुबलक प्रमाणात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT