संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमुक्त करा : शेतकरी संघटना

टीम अॅग्रोवन

सांगली  ः गेली काही वर्षे दुष्काळ आणि त्यानंतर महापुराने शेतकरी अडचणीत आहेत. शेतीमालाला योग्य हमीभावाअभावी कर्जाचा बोजा वाढतोच आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येकडे वळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केली.

केंद्र आणि राज्यातील सरकार शेतकरी विरोधी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्याबाबत साशंकता असून, शेतकरी विरोधी कायदे न बदलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला. 

सांगलीतील कल्पतरू मंगल कार्यालयात गुरुवारी (ता. १२) शेतकरी नेते शरद जोशी व हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शेतकरी हुतात्मा स्मृती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, शिवाजीराव नांदखिले, कालिदास आपेट, धनंजय ठाकडे, बंडा सोळंकी, अजित काळे, गणेश घुगे आदी उपस्थित होते. 

या वेळी रघुनाथदादा पाटील म्हणाले, की राज्यातील कोणत्याही शेतकरी संघटना शेतकऱ्यांची बाजू घेण्याच्या मनःस्थितीत नाही. गतवर्षी देशात तीन लाख ९८ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतीमालाला भाव मिळत नसल्याने आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. वाढती महागाई आणि कायम राहिलेला कर्जाचा बोजा यामुळे शेतकरी पिचून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिल्याशिवाय पर्याय नाही. गुजरातमधील कारखान्यांनी दोन वर्षांपूर्वीच उसाला ४७०० रुपये दर दिला. उत्तर प्रदेशात यंदाची एसएपी ३२५० रुपये आहे. हे पाहता राज्यातील शेतकऱ्यांचा तोटा होत आहे. दोन कारखान्यांतील अंतराची अट काढून टाकायला हवी. केंद्र आणि राज्यात भाजप सत्तेत असतानाही शक्‍य झाले नाही. टनाला ४ हजार दर मिळाला नाही, तर चालू झालेले कारखाने आम्ही बंद पाडू. 

या वेळी पुणे विचारवेधचे आनंद करंदीकर, शिवाजीराव नांदखिले यांचे भाषण झाले. जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील, महादेव कोरे, डी. जी. माळी, रावसाहेब ऐतवडे, वंदना माळी यांच्यासह राज्यातील पदाधिकारी, शेतकरी या वेळी उपस्थित होते. 

शेतकरी परिषदेतील प्रमुख ठराव... 

  • सरसकट कर्ज, वीजबिल माफी करावी. 
  • शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत. 
  •  शेतीमालावरील निर्यातबंदी उठवावी. 
  • उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावा. 
  • गायीच्या दुधाला ४०, तर म्हैशीच्या दुधाला ६० रुपये दर मिळावा.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT