संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

कळमना बाजार समितीत व्यवहार ठप्प

टीम अॅग्रोवन

नागपूर  ः कळमना बाजार समितीत धान्य व्यापाऱ्यानंतर आता घाऊक मिरची व्यापाऱ्यांनी देखील व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एकत्र येण्यास विरोध असल्याने खबरदारी म्हणून व्हॉटसअपवरच बैठक घेत व्यवहार बंदच्या निर्णयाचा ठराव घेण्यात आला. धान्य बाजार बंद झाल्याने तब्बल एक लाख पोती धान्याचा लिलाव अडचणीत आला आहे.

शेतमाल वाहतूक सुरु असली तरी पोलिसांकडून मात्र ठिकठिकाणी या वाहतूकदारांना त्रास दिला जात आहे. परिणामी कळमना बाजार समितीत देशाच्या इतर भागांतून शेतीमालाची वाहतूक अत्यंत किरकोळ प्रमाण होत आहे. पोलिसांच्या अडवणूकीमुळे मजूर देखील काम करण्यास तयार नाहीत. धान्याचा उठाव देखील वाहतूकीच्या अडचणीमुळे होत नसल्याने धान्य व्यापाऱ्यांनी बंदचा निर्णय घेतला.

शनिवारी (ता.२१) शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा लिलाव करण्यात आला. त्यानंतर त्यांना माल न आणण्यास सांगण्यात आले. सोमवारपासून (ता.२३) बाजार लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे बाजारात आधीच आलेल्या हरभरा, तूर, गव्हाच्या तब्बल एक लाख पोत्यांचे लिलाव रखडले आहेत. कळमना बाजार समितीत २२५ अडते, १० व्यापारी आहेत. या सर्वांनी सामूहिकस्तरावर हा निर्णय घेतला आहे. मिरची व्यापाऱ्यांचा बंद धान्यासोबतच मिरची व्यापाऱ्यांनी बंदचा निर्णय घेतला. त्याकरिता मंगळवारी (ता.२४) व्हॉटसअपवर बैठक झाली. यावेळी मतदान घेत सर्वांचा निर्णय जाणून घेण्यात आला. ११० पैकी ९५ टक्‍के व्यापाऱ्यांनी बंदला सहमती दर्शविली. या ठिकाणावरुन चीन, सिंगापूर, मलेशिया या भागात मिरची निर्यात होते, अशी माहिती मिरची व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद गर्ग यांनी दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT