शेतकऱ्यांना थेट कृषी निविष्ठा पुरविण्याच्या उपक्रमाचा रविवारी तेल्हारा येथे प्रारंभ झाला.
शेतकऱ्यांना थेट कृषी निविष्ठा पुरविण्याच्या उपक्रमाचा रविवारी तेल्हारा येथे प्रारंभ झाला.  
मुख्य बातम्या

तेल्हारा तालुक्यात कृषी निविष्ठांचा थेट पुरवठा सुरु 

टीम अॅग्रोवन

अकोला  ः कृषी विभागाच्या पुढाकाराने रविवारी (ता.३) तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खतांचा थेट पुरवठा सुरु करण्यात आला. 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू आहे. अशा परिस्थितीत खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रांवर येऊन बियाणे व खते खरेदी केल्यास जास्त गर्दी होऊ शकते. किमान अंतर न पाळल्यास कोरोनाचा फैलाव वाढू शकतो. ही बाब पाहता शेतकऱ्यांना सर्व कृषी निविष्ठा थेट बांधापर्यंत पोचविण्याकरिता तेल्हारा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे एक ऑनलाइन लिंक देण्यात आली. त्यावर शेतकऱ्यांची व शेतकरी गटांची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर खत आणि बियाण्यांचा पुरवठा करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 

रविवारी तेल्हारा येथील गणेश कृषी सेवा केंद्रावरून तालुक्यातील मौजे शेरी वडनेर व शेरी बुद्रूक येथे दोन शेतकरी गटांना एकूण ५८ बॅग खतांचा पुरवठा त्यांच्या बांधापर्यंत करण्यात आला. या उपक्रमामुळे शासनाने ठरवून दिलेल्या रास्त दरातच कृषी निविष्ठा शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत. तसेच शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होणार नाही व कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यास सुद्धा मदत होईल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखेडे यांनी केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Kharif Review Meeting : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमा

Sharad Pawar : सध्याचे केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात: शरद पवार

Mumbai Weather : मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे

Tur Market : तुरीला मिळतोय ११ हजारांच्या पुढे भाव

PM Narendra Modi : साठ वर्षे सत्ता उपभोगली, पण शेतीपर्यंत पाणी पोहोचवले नाही

SCROLL FOR NEXT