संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाईची मागणी

टीम अॅग्रोवन

कऱ्हाड, जि. सातारा  : जिल्ह्यातील एफआरपी थकविणाऱ्या साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन बळिराजा शेतकरी संघटनेने साखर आयुक्तांना प्रांताधिकाऱ्यांमार्फत दिले.

२०१९-२० मधील ऊस हंगामाची सांगता झाली आहे. काही कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ‘कोरोना’सारख्या संकटावर मात करण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही. त्यामुळे भाजीपाला शेतातच कुजून पडला आहे. काही शेतकऱ्यांनी तर बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे शेतीमाल रस्त्यातच टाकून दिला आहे. जिल्ह्यातील अपवाद सोडला तर एकाही कारखान्याने पूर्ण एफआरपी दिलेली नाही. सर्व उद्योग बंद पडले असताना शेती उद्योग सुरू आहे. शेतकऱ्यांना खते, बियाणे, मशागतीसाठी पैशांची गरज असताना अद्यापही कारखान्यांनी एफआरपी पूर्ण केली नाही. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

SCROLL FOR NEXT