गारपिटीनंतर आता धुक्याची चादर; थंडीतही वाढ
गारपिटीनंतर आता धुक्याची चादर; थंडीतही वाढ 
मुख्य बातम्या

गारपिटीनंतर आता धुक्याची चादर; थंडीतही वाढ

टीम अॅग्रोवन

पुणे : गेल्या दोन दिवसांपूर्वी मराठवाडा व विदर्भात झालेल्या गारपिटीच्या पावसामुळे वातावरणात ओलावा तयार झाला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील बहुतांशी भागात सकाळी धुक्याची चादर पसरली होती. बुधवारी (ता. १४) दिवसभर राज्यातील अनेक भागांत ढगाळ तर कोकणात ऊन पडल्याचे चित्र होते. गुरुवारी (ता.१५) सकाळी आठ वाजेपर्यंत मराठवाड्यातील उस्मानाबाद येथे १३.० अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  गेल्या दहा ते बारा दिवसांपासून मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तयार झालेले चक्राकार वारे आणि अरबी समुद्र व केरळच्या परिसरात असलेले कमी दाबाच्या क्षेत्रांची तिव्रता बुधवारी (ता.१४) कमी झाली आहे. मात्र, मराठवाड्यात समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर काही प्रमाणात चक्राकार वाऱ्याची स्थिती होती. पूर्वेकडून पश्चिमेकडे मंगळवारी (ता.१३) रात्री जोरात वारे वाहत होते. राज्यातील अनेक भागांत बुधवारी ऊन सावल्यांचा खेळ सुरू होता. आजपासून राज्यात आकाश निरभ्र राहणार असून पुन्हा काही दिवस थंडीत किंचित वाढ होईल.  ढगाळ हवामानामुळे मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली. नाशिकमध्ये १४.५ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली. कोकणात आकाश निरभ्र असल्याने बहुतांशी भागात किंचित थंडी होती. भिरामध्ये १७.० अंश सेल्सिअसचे सर्वात कमी किमान तापमान होते.   मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. मराठवाड्यातील औरंगाबाद येथे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंशाने वाढ झाली. उस्मानाबाद पाठोपाठ परभणी येथे १५.१ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान होते. विदर्भात काही भागात झालेल्या पावसामुळे किंचित थंडी होती. अमरावती, गोंदिया, यवतमाळ येथे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने घटले होते. गोंदिया येथे १४.५ अंश सेल्सिअसची सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   बुधवारी (ता. १४) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रुझ) १६.८ (-१), अलिबाग १९.० (१), रत्नागिरी १८.८ (-१), भिरा १७.० (१), डहाणू १७.७ (१), पुणे १३.३ (२), नगर १५.७ (३), जळगाव १५.० (१), कोल्हापूर १८.२ (२), महाबळेश्वर १५.० (१), मालेगाव १६.० (४), नाशिक १४.५ (-१), निफाड १६.०, सांगली १७.१ (२), सातारा १४.८ (१), सोलापूर १८.६ (१), औरंगाबाद १८.० (५), परभणी (कृषी विद्यापीठ परिसर) १७.५, परभणी शहर १५.१ (-१), नांदेड १८.० (३), उस्मानाबाद १३.०, अकोला १७.८ (२), अमरावती १६.२ (-१), बुलडाणा १६.६, चंद्रपूर १७.०, गोंदिया १४.५ (-१), नागपूर १५.१, वर्धा १५.७ (१), यवतमाळ १५.४ (-२)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT