माहुली पंपगृहातून आटपाडीकडे पाणी
माहुली पंपगृहातून आटपाडीकडे पाणी 
मुख्य बातम्या

माहुली पंपगृहातून आटपाडीकडे पाणी

टीम अॅग्रोवन

आटपाडी, जि. सांगली : लोकांच्या मागणीनंतर अखेर हिंगणगाव तलावातून वाहून जाणारे पाणी माऊली पंप हाऊसमधून उचलून आटपाडीकडे सोडण्यात आले. पाणी कमी झाल्यामुळे जादा वेळ पंप चालत नाहीत. टेंभू योजनेच्या पंप दुरस्तीचेही काम अंतिम टप्प्यात आले आहे, अशी माहिती मिळाली. 

महापुरात कृष्णा नदीतून प्रचंड पाणी वाहून गेले. टेंभू योजना सुरू करून आटपाडी तालुक्‍यातील तलाव या पाण्याने भरावे, अशी मागणी होती. मात्र टेंभूचे पंप हाऊस पाण्यात गेल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे टेंभू उपसा सिंचन योजना सुरू होत नव्हती. दुसरीकडे हिंगणगाव तलावातून अतिरिक्त पाणी वाहून जात होते. ते माहुलीत आणून तेथून उचलून आटपाडी तालुक्‍यातील तलाव भरावेत, अशीही मागणी केली जात होती. 

आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्र्यांकडे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला द्यावे, अशी मागणी केली. त्यानंतर राज्य सरकारने हे पाणी मोफत दुष्काळी भागाला देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसारहे पाणी माहुली पंप हाऊस मध्ये आणले आहे. 

पाणी कमी झाल्यामुळे दोन पंप सुरू करून पाणी उचलण्यात येत आहे. हे पाणी टप्पा क्रमांक चारमधून उचलून खानापूर तालुक्‍यातील भाग्यनगर तलावात सोडण्यात आले आहे. पाण्याचा वेग कमी झाल्यामुळे ज्यादा पंप सुरू करता येत नाहीत. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. आटपाडी तालुक्‍यातील घाणंद ते हिवतड या कालव्यावर जागोजागी गेटची कामे सुरू  आहेत. त्यामुळे पाणी सोडता येत नाही. सध्या टेंभू योजनेच्या पंपगृहातील पंप दुरुस्तीची आणि कालव्यातील कामे अंतिम टप्प्यात आहेत. ती चार दिवसांत पूर्ण होऊन टेंभू योजना सुरू करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

Jaljeevan Mission : रायगडमध्ये जलजीवनची निम्‍मी कामे अपूर्ण

Mango Market : उरणमध्ये आंब्यांची आवक वाढली

Water Scarcity : पाणीपुरवठा संस्थांचे शेतकरी पाणी टंचाईच्या कात्रीत

SCROLL FOR NEXT