सातपुड्यालगतचे मंगरूळ व अभोरा (ता. रावेर, जि. जळगाव) हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. सुकी प्रकल्पदेखील ९८ टक्के भरला असून, मोर प्रकल्पात ५१.६९, तोंडापूरमध्ये ७३.०६ टक्के जलसाठा आहे. मृतसाठा स्थितीत असलेल्या मन्याड प्रकल्पात आता २६.४७, बहुळामध्ये ५.०५ टक्के जलसाठा झाला आहे. पण बोरी, भोकरबारी व अग्नावती या तीन्ही प्रकल्पांमध्ये मात्र शून्य टक्केच जलसाठा आहे.
शनिवारी (ता.२३) दुपारी १२.४५ वाजता हतनूर धरणाचे आठ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडे होते, त्यात ८८.७१ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या गिरणा प्रकल्पात ६५.९० तर वाघूरमध्ये ७०.५२ टक्के पाणीसाठा झाला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.