टॅंकरव्दारे पाणीपुरवठा स्थिती
टॅंकरव्दारे पाणीपुरवठा स्थिती 
मुख्य बातम्या

परभणी जिल्ह्यात टॅंकरची संख्या घटली

टीम अॅग्रोवन

परभणी : गेल्या पंधरवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पूर्णा तालुक्यातील ८ टॅंकर बंद झाले असून, जिल्ह्यातील टॅंकरची संख्या ३४ पर्यंत कमी झाली आहे. गोदावरी नदीवरील ढालेगाव, मुद्दगल, डिग्रस येथील उच्च पातळी बंधाऱ्यांतील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. येलदरी, सिद्धेश्वर धरणातील मृत पाणीसाठ्यात घट सुरू आहे.

तीव्र पाणीटंचाई उद्भवलेल्या जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये ४२ टॅंकर सुरू होते. यामध्ये पालम तालुक्यातील १५, पूर्णा तालुक्यातील ८, गंगाखेड तालुक्यातील १०, सेलू तालुक्यातील ४, जिंतूर तालुक्यातील ५ टॅंकरचा समावेश होता. २९ गावे, १४ वाड्यांवरील एकूण ५७ हजार ९२६३ लोकसंख्या टॅंकरच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून होती. या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात पूर्णा तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. ओढे-नाल्यांना पूर आले होते. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत करण्यात आलेल्या जलसंधारणांच्या कामांमुळे पडलेल्या पावसाचे पाणी जमीन मुरल्याने भूजल पातळीत वाढ झाली. त्यामुळे आठ गावांना पाणीपुरवठा करणारे टॅंकर बंद झाले असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

जोरदार पावसामुळे गोदावरी नदीवरील ढालेगाव येथील बंधाऱ्यामध्ये रविवारी (ता.१७) सकाळी आठ वाजता १२.९६, मुद्दगल बंधाऱ्यामध्ये ९.६८, डिग्रस बंधाऱ्यामध्ये ३०.९१ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या आठवड्यामध्ये येलदरी धरणातील मृतपाणीसाठ्यात वाढ झाली होती. परंतु पाऊस उघडल्यामुळे आता घट सुरू झाली आहे. निम्न दुधना तसेच करपरा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT