वऱ्हाडात पीक कर्जवाटप रखडले
अकोला : या खरीप हंगामासाठी दिलेल्या पीककर्जाच्या उद्दीष्टाच्या अासपास वऱ्हाडातील एकही जिल्हा जाण्याची शक्यता नसल्याची वस्तुस्थिती समोर येत अाहे. अातापर्यंत अकोल्यात २७.८० टक्के, बुलडाण्यात २६, तर वाशीममध्ये अवघे १८ टक्के पीक कर्जवाटप झाले अाहे. मागील अनेक वर्षात पहिल्यांदा इतकी कमी कर्जवाटपाची स्थिती निर्माण झाली अाहे.
एप्रिलपासून पीक कर्जवाटप सुरू असून अाता अाॅगस्ट संपायला अाला अाहे. सप्टेंबर अखेर पासून रब्बीसाठी पुन्हा वेगळे कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू होणार अाहे. पीक कर्जवाटपाला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून स्थानिक अामदारापर्यंत सर्वांनी वेळोवेळी बैठका घेत निर्देश दिले. मात्र, पीक कर्जवाटप होऊ शकलेले नाही. या हंगामासाठी दिलेली वाढीव पीक कर्जवाटपाची रक्कम ही केवळ कागदांवरच दिसणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अकोला जिल्ह्यात अातापर्यंत १३३४ कोटींच्या तुलनेत ३७० कोटी ९५ लाख म्हणजेच २७.८० टक्के पीक कर्जवाटप झाले. वाशीममध्ये १४४५ कोटींच्या तुलनेत २६३ कोटी १० लाख ८० हजार म्हणजेच १८ टक्के अाणि बुलडाणा जिल्ह्यात उद्दीष्ट असलेल्या १७४५ कोटींच्या तुलनेत ४६८ कोटी ८७ लाख (२६.८६ टक्के) रुपये वाटप झाले.