फळबागा तोडण्याची शेतकऱ्यांवर वेळ
फळबागा तोडण्याची शेतकऱ्यांवर वेळ 
मुख्य बातम्या

फळबागा तोडण्याची शेतकऱ्यांवर वेळ

टीम अॅग्रोवन

जवळगाव, जि. बीड ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांचे जगणे वेदनादायी बनले आहे. आटत चाललेल्या विहिरी, बाजारभावाचे गंभीर प्रश्‍न उभे राहिले. पाण्यामुळे अंबाजोगाई तालुक्‍यातील जवळगाव येथील भागवतराव हारे यांनी अडीच एकरांतील नऊ वर्षे वयाची अंजीर बाग तोडून टाकली आहे. 

भागवतराव हारे यांची जवळगाव शिवारात अडीच एकरांत अंजीर बाग होती. नऊ वर्षांपूर्वी त्यांनी बाग उभी केली. मध्यंतरी या बागेने चांगले उत्पादनही दिले; परंतु गेल्या तीन-चार वर्षांत या भागात पाऊस कमी झाल्याने पाण्याची पातळी खालावली. आधी विहीर आटली. त्यानंतर बोअरवेलही कोरडे पडले. बागेला द्यायलाही त्यांच्याकडे पाणी नव्हते. अखेरीस त्यांनी जड अंतःकरणाने ही बाग तोडण्याचा निर्णय घेतला.

गेल्या आठवड्यात हे झाड तोडण्याचे काम पूर्ण झाले. आज या शेतात अंजीर झाडांचे अवशेष तेवढे पडून आहेत. तीन महिन्यांपूर्वी हे शेत हिरवेगार होते; परंतु जसे पाणी आटले तशी बाग करपत होती. पाण्याची सोय न करता आल्याने अखेरीस हे कठोर पाऊल उचलले. या भागात दोन महिन्यांपूर्वीच अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरने तळ गाठला आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला खरा; मात्र एकही उपाययोजना लागू झालेली नाही. 

जवळगाव परिसरात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. फळबागांना मोठा फटका बसतो आहे. पाण्याच्या पातळीत मोठी घट झाल्याने विहिरी कोरड्या पडत आहेत. बोअरवेलला पाणी लागत नाही. बागा जगविण्यासाठी केलेला खर्चही निघणे झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

यंदा फळबाग लागवडीवर परिणाम झाला आहेच; पण त्या बागा जगवण्याचेही मोठे संकट शेतकऱ्यांवर आले आहे. फळबागा जगवण्यासाठी आधार असलेला मुरंबी तलावही कोरडा आहे. जवळगाव परिसरातील शेतकरी फळबागा मोडत आहेत.-भागवत हारे, शेतकरी, जवळगाव  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT