पर्यटनवाढीसाठी ३ हजार कोटींचे करार : राज्यमंत्री आदिती तटकरे
पर्यटनवाढीसाठी ३ हजार कोटींचे करार : राज्यमंत्री आदिती तटकरे 
मुख्य बातम्या

पर्यटनवाढीसाठी ३ हजार कोटींचे करार : राज्यमंत्री आदिती तटकरे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत आदरातिथ्य क्षेत्रातील विविध घटकांसमवेत सुमारे दोन हजार ९०५ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त सह्याद्री राज्य अतिथिगृहात हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, की आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्यात आला आहे. यासाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. या सामंजस्य करारातून राज्याच्या सर्वच भागांत गुंतवणूक होत आहे. त्यातून पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्राला मोठी चालना मिळेल. रोनोत्तर काळात राज्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. शासनाच्या वतीने सर्व विभागांमध्ये पर्यटन महोत्सव भरवले जातील, असे पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT