... then on insurance companies Will file charges: straw
... then on insurance companies Will file charges: straw 
मुख्य बातम्या

...तर विमा कंपन्यांवर  गुन्हे दाखल करणार : भुसे

टीम अॅग्रोवन

पुणे : शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे वेळेत न दिल्यास विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीत विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांचा आढावा घेताना भुसे यांनी विमा कंपन्यांना धारेवर धरले. कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार तसेच आयसीआयसीआय लोम्बार्ड, रिलायन्स, इफ्को टोकियो, एचडीएफसी एर्गो, बजाज अलियांझ, एआयसी या विमा कंपन्यांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. खरीप हंगाम २०२१च्या पीकविमा योजनेमध्ये ८४ लाखांपेक्षा अधिक शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यापोटी ४५१० कोटी रुपये विमा हप्ता कंपन्यांना मिळणार असून, २३१२ कोटी रुपयांचा पहिला विमा हप्ता दिला आहे. सध्याच्या पावसामुळे होणारे नुकसान व पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान, या बाबत विम्याची रक्कम निश्‍चित होणे अजून बाकी आहे. त्यामुळे भरपाई काही महिन्यांत वाटली जाणार आहे. जुलै २०२१ मध्ये पावसाचा खंड पडल्याने २३ जिल्ह्यांतील  ११.३५ लाख ४२५ कोटी रुपये नुकसानभरपाई निश्‍चित झाली आहे. अतिवृष्टीनंतर ३९ लाख शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना पूर्वसूचना दिली आहे. आतापर्यंत त्यातील २३.२३ लाख शेतकऱ्यांना १५२५ कोटी भरपाई निश्‍चित झाल्याचे भुसे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT