सोलापूर : धरणग्रस्तांच्या प्रश्नासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने पंढरपुरात तहसील कार्यालयासमोर मंगळवारपासून (ता. १२) बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. राज्यातील नऊ जिल्ह्यांत एकाच वेळी हे आंदोलन सुरू आहे.
श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष मोहन अनपट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला सुरवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तहसीलदार मधुसूदन बर्गे व जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी माधवी चव्हाण यांनी भेट दिली. आमच्या स्तरावरील सर्व मागण्यांबाबत सकारात्मक विचार करू, असे आश्वासन त्यांनी दिले. पण जोपर्यंत मुख्यमंत्री स्वतः या मागण्यांची दखल घेऊन बैठक लावत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला. त्यामुळे हे आंदोलन आणखी काही दिवस तरी चालण्याची शक्यता आहे.
उजनी, कन्हेर, कोयना धरणग्रस्तांचे बहुतांश पुनर्वसन पंढरपूर उपविभागामध्ये करण्यात आले. पण ते फक्त नावालाच झाले आहे, आजही आमचे प्रश्न कायम आहेत, याकडे अनपट यांनी लक्ष वेधले. पण आता माघार घेणार नाही, असेही ते म्हणाले.
या आहेत मागण्या...
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.