राज्यस्तरीय कार्यशाळेचे उदघाटन करताना साखर आयुक्त शेखर गायकवाड.
राज्यस्तरीय कार्यशाळेचे उदघाटन करताना साखर आयुक्त शेखर गायकवाड.  
मुख्य बातम्या

आव्हानांवर मात करण्यासाठी कारखान्यांनी प्रयोगशील व्हावे ः साखर आयुक्त

टीम अॅग्रोवन

पुणे : साखर उद्योगासाठी यंदाचे वर्ष ‘टर्निंग पॉइंट ठरणार आहे. त्यामुळे विविध आव्हानांवर मात करण्यासाठी राज्यातील साखर कारखान्यांना अतिशय प्रयोगशील व्हावे लागेल, असा सल्ला साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला.  

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) व  डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट (डीएसटीए) यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता.१७) आयोजित केलेल्या साखर उद्योगातील प्रक्रिया अभियांत्रिकी आणि उत्पादन तंत्र याविषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. गायकवाड बोलत होते. विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, सरचिटणीस पांडुरंग राऊत, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, डीएसटीएचे उपाध्यक्ष एस. एस. गंगावती, बाबासाहेब पवार या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या वेळी श्री. गायकवाड म्हणाले, की साखर कारखान्यांसाठी यंदाचे वर्ष महत्त्वाचे असल्याने अतिशय नियोजनपूर्वक वाटचाल करावी लागेल. दुष्काळामुळे ऊस उत्पादन घटेल पण साखरेचा साठा चांगला राहील. एकीकडे आफ्रिकन देशात कारखानदारी वाढत राहील. दुसरीकडे आरोग्यासाठी साखर अपायकारक असल्याचा प्रचार वाढत असल्याने खप कमी होत जाण्याची देखील शक्यता आहे. अशा स्थितीत कारखान्यांना प्रयोगशील व्हावे लागेल.

कारखान्यांनी बांधावरच ऊसतोड करून थेट ज्यूस तयार करून नंतर कारखान्यात नेता येतो का ते पाहावे, मध्यस्थांना हटवून साखर विक्रीसाठी प्रयत्न करावा तसेच इथेनॉल मिश्रणातदेखील स्वतः पुढाकार घ्यावा, अशा सूचना देखील श्री. गायकवाड यांनी  केल्या. 

खासगी आणि सहकारी कारखाना असा भेद केंद्र शासन करीत असल्याबद्दल श्री. ठोंबरे यांनी नाराजी व्यक्त केली. ‘‘खासगी कारखान्यांना २०१५ मधील सॉफ्टलोन व्याज सवलत, २००९ मधील घट उतारा अनुदान दिले गेले नाही. नव्या इथेनॉल धोरणातही भेदभाव करण्याचा प्रयत्न होत आहे,’’ असे श्री. ठोंबरे यांनी नमूद केले. 

श्री. दांडेगावकर म्हणाले, की ऊस आणि कापूस या दोन्ही पिकांमुळे राज्यात साखर व वस्त्रोद्योग तयार झाला. मात्र, नियोजनपूर्वक प्रोत्साहन न मिळाल्याने दोन्ही उद्योग भरभराटीला आले नाहीत आणि लयालाही गेले नाहीत. या उद्योगांना कुंठितावस्थेतून बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. साखर उद्योगाला मात्र कमी पाण्यात, कमी वेळेत मिळणाऱ्या आणि जादा उतारा असलेल्या ऊस वाणाशिवाय पर्याय नाही,” 

या वेळी विस्माचे कार्यकारी संचालक अजित चौगुले, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ तसेच राज्यातील १२५ कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. साखर उद्योगातील प्रक्रिया अभियांत्रिकी आणि उत्पादन तंत्रावर या वेळी विविध तज्ज्ञांकडून सादरीकरण करण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

SCROLL FOR NEXT