सोयाबीन
सोयाबीन  
मुख्य बातम्या

देशात सोयाबीन उत्पादन घटीचे संकेत

कोजेन्सिस वृत्तसेवा

मुंबई ः देशातील महत्त्‍वाच्या सोयाबीन उत्पादक मध्य प्रदेशमध्ये यंदा उत्पादनात घट आली आहे. तसेच दुसरे महत्त्वाचे उत्पादक राज्य राजस्थाननेही आधीच उत्पादनाचा सुधारित अंदाज जाहीर करून कमी उत्पादन होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे देशातील सोयाबीन उत्पादनात घट होणार आहे, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला.  केंद्र सरकारने यंदा सप्टेंबर महिन्यात जाहीर केलेल्या १२.२ दशलक्ष टन सोयाबीन उत्पादनाच्या अंदाजात १५ टक्के कपात केली आहे. मागील वर्षी देशात १३.८ दशलक्ष टन सोयाबीन उत्पादन झाले होते. त्यामुळे सरकारने याआधी जाहीर केलेला अंदाज हा मागील वर्षीच्या उत्पादनापेक्षा कमी आहे. त्यानंतर लगेच मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन्ही राज्यांनी उत्पादन घटणार असल्याचे जाहीर केले आहे. कमी उत्पादनाचा अंदाज जाहीर केल्यानंतर देशात सोयाबीनचे दर वाढले आहेत. मागील तीन महिन्यांत सोयाबीनचे दर ३३ टक्क्यांनी वाढून एनसीडीएक्सवर प्रतिक्विंटल ३७८० रुपये होऊन १७ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर गेले आहेत. मागील आठवड्यात सोयाबीनचे मागील चार वर्षांतील उच्चांकी ४ लाख ४० हजार टनांचे कॉन्ट्रॅक्ट झाले आहेत. स्पॉट मार्केटमध्ये आॅक्टोबर महिन्यात सोयाबीचे प्रतिक्विंटल २५०० रुपये दराने व्यवहार झाले होते. त्यात आता ४३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मध्य प्रदेश सरकारने भावांतर योजना लागू केल्यानंतर किमती काही प्रमाणात वाढल्या होत्या. मध्य प्रदेशात ५.३ दशलक्ष टन उत्पादन होणार मध्य प्रदेश सरकारने जाहीर केलेल्या पहिल्या अंदाजात राज्यात ६.९ दशलक्ष टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज जाहीर केला होता; मात्र त्यात कपात करून दुसऱ्या सुधारित अंदाजात ५.३ दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज जाहीर केला आहे. राजस्थानमध्येही बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दुष्काळी स्थिती असल्याने राज्याने पहिल्या अंदाजात दर्शविलेल्या २ दशलक्ष टन उत्पादनात कपात करून १ दशलक्ष टन उत्पादन होणार असल्याचा अंदाज जाहीर केला आहे, तर महाराष्ट्रातही मागील वर्षीच्या ४.६ दशलक्ष टन उत्पादनाच्या तुलनेत यंदा ३.६ दशलक्ष टन उत्पादन होणार असल्याचा अंदाज राज्याने व्यक्त केला आहे.    आणखी दरवाढीचे संकेत देशातील सायोबीन हंगाम संपल्यानंतर जेव्हा मे महिन्यात तुटवडा जाणवेल, तेव्हा किमती ४००० ते ४५०० रुपयांपर्यंत जाऊ शकतात. देशात १.३ ते १.५ दशलक्ष टन मागील वर्षाचा साठा शिल्लक आहे. ८.५ दशलक्ष टन उत्पादन झाल्यानंतर एकूण साठा हा १० दशलक्ष टनांपर्यंत जाईल. आॅक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान अंदाजे २.५ दशलक्ष टन सोयाबीनचे गाळप झाले आहे आणि पुढील हंगामात पेरणीसाठी बियाणे म्हणून १.२ ते १.५ दशलक्ष टनांची गरज आहे. त्यामुळे आता जानेवारी ते सप्टेंबर या काळासाठी फक्त ६ दशलक्ष टन सोयाबीन उपलब्ध असणार आहे, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chilli Cultivation : धाड परिसरात शेकडो हेक्टरवर यंदा झाली मिरचीची लागवड

Jharkhand Rain Update : झारखंडमध्ये अवकाळीचा कहर; वीज पडून पाच तर झाड कोसळून दोघांचा मृत्यू 

Water Agitation : हंडा घेऊन महिला धडकल्या सिंचन विभागाच्या कार्यालयावर

Loksabha Election 2024 : धाराशिवमध्ये मोठी चुरस

Liger Pesticide : ‘जीएसपी’चे कीटकनाशक ‘लायगर’ बाजारात

SCROLL FOR NEXT