शेतकरी कामगार पक्षाचे अधिवेशन
शेतकरी कामगार पक्षाचे अधिवेशन 
मुख्य बातम्या

ठरावांच्या पूर्ततेसाठी चळवळ उभी करा ः गणपतराव देशमुख

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद  : अधिवेशनाच्या माध्यमातून केवळ ठराव करून चालणार नाही. त्या ठरावांच्या पूर्तीसाठी चळवळ उभी करण्याचा सल्ला शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांनी दिला.

औरंगाबाद येथे शेतकरी कामगार पक्षाच्या १७ व्या अधिवेशनाचा गुरुवारी (ता.२) समारोप झाला. या वेळी श्री. देशमुख बोलत होते. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (बुधवारी) शेतकऱ्यांच्या हिताचे पडसाद २०१९ मधील निवडणुकीत दिसतील, असा सूर चर्चेतून निघाला. या वेळी पक्षातर्फे दहा ठराव मांडण्यात आले. अधिवेशनाच्या उद्‌घाटनप्रसंगी आमदार धैर्यशील पाटील यांनी शेकापची भूमिका स्पष्ट केली होती. या वेळी गणपतराव देशमुख, जयंत पाटील, मीनाक्षी पाटील, विवेकानंद पाटील, माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख, नरसय्या अडम उपस्थित होते.

गुरुवारी पहिल्या दिवशी मांडलेल्या ठरावांवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर राहुल पोकळे व प्रवीण गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले. या वेळी श्री. देशमुख म्हणाले, की ठराव घेतले पण त्यासाठीच्या निर्णयाची अंमलबजावणी करायला लावण्याची जबाबदारी सर्वांची आहे. शेतीमालाला हमीभाव मिळायलाच हवा. आश्‍वासने दिली जातात, पण ती कागदावरच राहतात, त्यामुळे त्यासाठी कायदा करायला हवा. मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे शिवाय धनगर आणि मुस्लिमांनाही आरक्षण मिळाले पाहिजे. सध्याचे सरकार कष्टकऱ्यांचे नाही. त्यामुळे आपण घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला भाग पाडण्यासह २०१९ च्या निवडणुकीत परिवर्तनासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने झोकून देऊन काम करावे.

जयंत पाटील म्हणाले, की शासनाची कर्जमाफी खोटी आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर मतभेद आहेत; परंतु ते लोकशाही मानणारे आहेत. लोकशाही टिकली पाहिजे ही शेकापची भूमिका आहे. येत्या काळात शेकापमध्ये संघटनात्मक आमूलाग्र बदल केले जातील.  या अधिवेशनाला सुरक्षेच्या कारणास्तव ज्येष्ठ नेते शरद पवार, सीताराम येचुरी आदी दिग्गज नेते मंडळी येऊ शकले नसल्याची माहिती अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देण्यात आली होती.

अधिवेशनातील प्रमुख ठराव    

  • शेतीमालाला खर्चाच्या आधारे किफायतशीर किंमतीची हमी देऊन त्यासाठी व्यवस्था निर्माण करावी.
  •  मराठा समाजाला विनाविलंब आरक्षण देण्यासंबंधी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी.
  • शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी.   
  • समन्यायी पाणीवाटपाच्या धोरणाची अंमलबजावणी करावी.    
  • धनगर, लिंगायत समाजाला आरक्षण द्यावे.    
  • महिलांसाठी विधिमंडळ व लोकसभेत ३३ टक्के जागा आरक्षित ठेवाव्यात.    
  • मराठी सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट करावा.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

    Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

    Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

    Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

    Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

    SCROLL FOR NEXT