विश्‍वासघातकी सरकारला शेतकरी घरी पाठवतील ः सावंत
विश्‍वासघातकी सरकारला शेतकरी घरी पाठवतील ः सावंत 
मुख्य बातम्या

विश्‍वासघातकी सरकारला शेतकरी घरी पाठवतील ः सावंत

टीम अॅग्रोवन

नगर ः भाजप सरकारने जाहीरनाम्यात शेतकरी, शेती विकासाचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजपला मदत केली. मात्र, आश्‍वासनाचा विसर पडल्याने तीन राज्यांत झटका दिला. आता विश्‍वासघातकी सरकारला शेतकरी घरी पाठवतील. येत्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लाल किल्ल्यावर झेंडावंदन करता येणार नाही, याची व्यवस्था शेतकरी करतील, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे नेते दशरथ सावंत यांनी दिला आहे. 

स्वामिनाथन समितीच्या शिफारसी तातडीने लागू कराव्यात, वीजबिल संपूर्णपणे माफ करावे, कांद्याचा प्रश्‍नावर सरकारने तातडीने तोडगा काढावा व सध्याच्या दुष्काळी स्थितीवर तातडीने उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी गुरुवारी (ता. १०) नेवासे फाटा (ता. नेवासा) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोपळे, माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत, जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे, गुलाबराव डेरे, विठ्ठल शेळके, शंकर लहाणे, ज्ञानेश्‍वर सोडणर, प्रताप पटारे यांच्यासह पदाधिकारी आणि शेतकरी सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

SCROLL FOR NEXT