Sarpanch will lead to stop Corona in washim
Sarpanch will lead to stop Corona in washim 
मुख्य बातम्या

वाशीममध्ये कोरोना रोखण्यासाठी सरपंच करणार नेतृत्व

टीम अॅग्रोवन

वाशीम : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व गावांमध्ये सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत. या समितीमध्ये ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यांच्यासह सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून, याचाच एक भाग म्हणून गावस्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, गावात राहणारे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश असून, पोलिस पाटील हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.

अत्यावश्यक कामाशिवाय गावातून कोणीही बाहेर पडू नये, असे आवाहन करणे, गृह विलगीकरण करण्यात आलेला रुग्ण बाहेर फिरत असल्याचे आढळून आल्यास अशा व्यक्तींची नावे तहसील कार्यालयास सादर करणे, एकाच ठिकाणी ५ पेक्षा अधिक व्यक्ती जमणार नाहीत याची दक्षता घेणे, विशेषतः लग्न समारंभ व इतर गर्दीचे कार्यक्रमावर नियंत्रण ठेवणे, वेळोवेळी दिलेल्या वेळेतच आस्थापना, दुकाने सुरू राहू शकतील वेळेआधी किंवा वेळेनंतर आस्थापना, दुकाने सुरू राहणार नाहीत, याची खात्री करणे. सर्व आस्थापनांमध्ये कोरोनाचे नियम पाळणे आवश्‍यक आहे.

आठवडी बाजार भरल्याने ग्रामविकास अधिकारी निलंबित कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित दिलेले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून इंझोरी (ता. मानोरा) येथे २५ फेब्रुवारी रोजी आठवडी बाजार भरविण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने याप्रकरणी कर्तव्यात कसूर करणाऱ्या इंझोरीच्या ग्रामविकास अधिकारी किसन वडाळ यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांनी आदेश काढले. कोरोना विषाणूचा जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील आठवडी बाजार, गुरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तरीही २५ फेब्रुवारी रोजी इंझोरी येथे आठवडी बाजार भरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे इंझोरी येथे कार्यरत असलेले ग्राम विकास अधिकारी किसन वडाळ यांनी कर्तव्यात कसूर करून आदेशाचा भंग केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market Rate : कांदा खरेदीचा मलिदा कोण खाणार ? कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमीच

Kolhapur Farmers : कोल्हापुरातील शेतकरी राष्ट्रीय महामार्ग रोखणार, भारत पाटणकर यांचा इशारा

Crop Damage : केळी, पपईच्या नुकसानीची भरपाई द्या : शेतकऱ्यांची मागणी

Drought Condition : माथा ते पायथा जलसंधारणातून दुष्काळाच्या झळा कमी करणे शक्य

Manjra Dam : ‘मांजरा’तील गाळाच्या आकड्यांचा घोळ

SCROLL FOR NEXT