सोलापूर येथे शेतकरी मेळावा
सोलापूर येथे शेतकरी मेळावा 
मुख्य बातम्या

‘एफआरपी’ जमा न केल्यास सहकारमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढू : खासदार शेट्टी

टीम अॅग्रोवन

सोलापूर   ः ‘एफआरपी’ थकविणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यावरील कारवाईस स्थगिती देणारे आणि हंगाम संपून चार-पाच महिने उलटूनही एफआरपी देण्यासाठी मुदतवाढ देणारे सहकारमंत्री सुभाष देशमुख शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत की कारखानदारांच्या, असा प्रश्‍न करीत आता तारीख पे तारीख चालणार नाही. येत्या शनिवारपर्यंत (ता. १५) ‘एफआरपी’चे थकलेले सगळे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा गुरुवारी (ता. २०) सहकारमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी दिला. सहकारमंत्र्यांच्या कारखान्याकडेच थकबाकी आहे; मग न्याय कोणाला मागणार, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ज्येष्ठ नेते (स्व.) वसंतराव आपटे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी (ता. ११) आयोजित शेतकरी मेळाव्यात खासदार शेट्टी बोलत होते. या वेळी आपटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि ‘काळी आई’ या लघुचित्रपटाचे सादरीकरण झाले. ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे, ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा अब्दुलपूरकर, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके, वसंत पाटील, जिल्हाध्यक्ष महामूद पटेल, समाधान फाटे, विनय आपटे, महेश आपटे, सरचिटणीस विजय रणदिवे, उमाशंकर पाटील आदी उपस्थित होते.

श्री. शेट्टी म्हणाले, की सहकारमंत्री हे एक जबाबदार मंत्री आहेत, ते स्वतः कारखानदार आहेत. त्यांच्याच कारखान्याकडे थकबाकी आहे. मी स्वतः त्यांना भेटलो, तेव्हा सर्व कारखान्यांना पाच सप्टेंबरची मुदत त्यांनी घेतली. आता पुन्हा १५ सप्टेंबरची मुदत त्यांनी कारखानदारांना दिली आहे. १४ दिवसांच्या आत एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला हवी. पण इथे सर्वच कारखान्यांनी या नियमांचे थेट उल्लंघन केले आहे. फौजदारी स्वरूपाचा हा गुन्हा आहे; पण कारवाई होत नाही, ही जबाबदारी कोणाची? उलट कारवाईच्या नोटिसा दिलेल्या कारखान्यांवरील कारवाईस मंत्री महोदय स्थगिती देतात. पण आता तारीख पे तारीख बस्स झाली. १५ सप्टेंबर ही आमची शेवटची संधी असेल, त्या तारखेपर्यंत पैसे जमा झाले नाहीत, तर थेट मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढून पैसे वसूल करू.

या वेळी श्री. तुपकर, अमोल हिप्परगे यांची भाषणे झाली. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष पटेल यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका सांगितली. अतिश पाटोळे यांनी सूत्रसंचालन केले. विजय रणदिवे यांनी आभार मानले.   खासदार शेट्टी म्हणाले...

  • सहकारमंत्र्यांच्या सोलापुरातच सर्वाधिक १२५ कोटींची थकबाकी.
  • कारखानदारांनी साखरेची विक्री योग्य वेळी न केल्याने अडचण.
  • एफआरपी दोन टप्प्यांत देण्याचा निर्णय, पण आमचा विरोध.
  • हुमणीचा प्रश्‍न सध्या बिकट, पण कृषी विभाग, कृषी विद्यापीठे शांतच.
  • साडेनऊ टक्‍क्‍यांऐवजी दहा टक्‍क्‍यांवर आधारित एफआरपी देणार, पण निर्णय फसवा.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

    Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

    Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

    Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

    Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

    SCROLL FOR NEXT