राजू शेट्टी
राजू शेट्टी 
मुख्य बातम्या

`केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी विशेष अधिवेशन घ्यावे`

टीम अॅग्रोवन

मुंबई  ः राज्यातीलच नव्हे तर देशातील शेतकऱ्यांवर अतिशय बिकट परिस्थिती ओढवली आहे. मोदी सरकारने घोषणा करूनही शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव दिलेला नाही. दूध आणि भाजीपाल्याचे दरही घसरत आहेत, या सर्व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष अधिवेशन घ्यावे, अशी मागणी केल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली. काही खासगी विधेयके आपण मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत खासदार शेट्टी यांनी ही माहिती दिली. राज्यात शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे. शेतकरी हितासाठी होणाऱ्या सर्व आंदोलनांना आमचा पाठिंबा असेल; मात्र या आंदोलनात आम्ही सहभागी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीस सरकारने दिलेली कर्जमाफी ही फसवी असून, त्याचा शेतकऱ्यांना फायदा झालेला नाही. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी ४२ हजार कोटी रुपयांचे कर्ज उचलले होते. मात्र, या वेळी केवळ २२ हजार कोटी रुपयांच्या कर्जाची उचल झाली आहे. ती कर्जमाफी मिळाली म्हणून नव्हे; तर शेतकऱ्यांना बॅंकांनी कर्ज नाकारले म्हणून, असा आरोप शेट्टी यांनी केला. शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही कर्ज थकीत दिसते आहे. त्यामुळे बॅंका त्यांना कर्ज नाकारत आहेत, तर शेतकऱ्यांना ना हरकत प्रमाणपत्रे मिळत नाहीत त्यामुळे बॅंकांनी व्याज आकारणी सुरू केली असून, हे अन्यायकारक असल्याचे श्री. शेट्टी यांनी सांगितले. 

विरोधी पक्षांची एकजूट होत असल्याने मोदी सरकारचे धाबे दणाणले आहे. त्यामुळेच आता भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना ‘मातोश्री’चे दरवाजे दिसले, असा टोलाही त्यांनी लगावला. हे सरकार अन्यायकारक असून, ते घालवण्यासाठी आपण विरोधी आघाडीत सामील झालो आहोत. मात्र, केवळ सत्तांतर हा आपला हेतू नसून, शेतकऱ्यांचे हित हाच उद्देश असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.  

पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी रासायनिक खतांवर बंदी आणण्याबाबत केलेल्या वक्तव्याची खिल्ली उडवून शेट्टी म्हणाले, की हे शक्य नाही; कारण असे झाल्यास शेतीतील उत्पादकता घटून शेतीमालाचे भाव प्रचंड वाढतील, जे ग्राहकांना परवडणारे नसतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

SCROLL FOR NEXT