Rains hit soybeans in Nanded district
Rains hit soybeans in Nanded district 
मुख्य बातम्या

नांदेड जिल्ह्यात पावसामुळे सोयाबीनला फटका

टीम अॅग्रोवन

नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे सततच्या रिमझिम पावसामुळे रोग पडून मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनला शेंगा सुद्धा लागलेल्या नाहीत. पावसामुळे नुकसान होणे, रोग पडणे आदी आपत्ती आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली.

जिल्हाभरात यावर्षी सततच्या रिमझिम पावसामुळे सोयाबीन पिकाची वाढ खुंटली आहे. पीक पिवळे पडत आहे. बुरशीजन्य रोगांमुळे फुले येत नाहीत. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात  ५० टक्कें पेक्षा अधिक घट येणार आहे.

पीक विमाच्या नियमावलीनुसार उत्पन्नात अपेक्षित घट ही ५० पेक्षा अधिक असेल, तर २५ टक्के विमा परतावा आगाऊ दिला जातो. यावर कृषी विभागाने योग्य ती कारवाई करून सोयाबीन नुकसानीचे वैयक्तिक पंचनामे करून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीअंतर्गत मदत, तसेच पीकविमा नियमानुसार २५ टक्के आगाऊ पीकविमा देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी  देवसरकर यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT