गव्हाचे क्षेत्र घटले
गव्हाचे क्षेत्र घटले 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात १७ लाख ३१ हजार हेक्टरवर रब्बी पेरणी

टीम अॅग्रोवन
औरंगाबाद  : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत रब्बी ज्वारीसह गव्हाचे क्षेत्र घटले आहे. दुसरीकडे यंदा मक्‍याचे क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत विस्तारले आहे. यंदा मराठवाड्यात १८ लाख ७ हजार हेक्‍टर या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १७ लाख ३१ हजार हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 
 
गतवर्षी रब्बी हंगामात १८ लाख ४४० हेक्‍टर इतके सर्वसाधारण क्षेत्र गृहीत होते. त्यातुलनेत २० लाख ८९ हजार हेक्‍टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली होती. यंदा मात्र खरीप पूर्णत: हातचा गेला, परतीच्या पावसाने जमिनीतील ओल व वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे रब्बीची आशा वाढली. मात्र असे असतानाही डिसेंबर अर्धा संपूनदेखील सर्वसाधारण क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली नाही.
 
गतवर्षी संपूर्ण मराठवाड्यात जवळपास ८ लाख १७ हजार हेक्‍टरवर ज्वारीची पेरणी झाली होती. यंदा मात्र ६ लाख हेक्‍टरवरच पेरणी झाली. गतवर्षी गव्हाची ३ लाख १७ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली होती. यंदा डिसेंबरच्या मध्यापर्यंत २ लाख २६ हजार हेक्‍टरवर गव्हाचा पेरा झाला आहे. गतवर्षी रब्बी मक्‍याची ६७ हजार ४०० हेक्‍टरवर पेरणी झाली होती.
 
यंदा ३६ हजार ९८० हेक्‍टरवर रब्बी मक्‍याची पेरणी झाली आहे. यंदा रब्बी मक्‍याचे सर्वसाधारण क्षेत्र १८ हजार ६९७ हेक्‍टर गृहीत होते, त्या तुलनेत मक्‍याची पेरणी जास्त क्षेत्रावर झाल्याचे दिसते आहे. गतवर्षी इतर गळीतधान्यांची पेरणी ६२ हजार हेक्‍टरवर झाली होती. यंदा गळीतधान्यांची पेरणी केवळ ३१ हजार १६८ हेक्‍टरवरच अडली आहे. 
 
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदा ८ लाख ३३ हजार हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. त्यामध्ये औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत २ लाख १८ हजार हेक्‍टर; तर लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड व हिंगोली या पाच जिल्ह्यांत ६ लाख १४ हजार हेक्‍टरचा समावेश आहे. गतवर्षी मराठवाड्यात ८ लाख १८ हजार हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली होती. 

औरंगाबाद, परभणी, हिंगोली व उस्मानाबाद जिल्ह्यांत अजूनही सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत अपेक्षित रब्बी पेरणीचा टप्पा पार झालेला नाही. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७९, उस्मानाबाद जिल्ह्यात ८६, परभणी जिल्ह्यात ७२  तर हिंगोली जिल्ह्यात ८५ टक्‍के क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. जालना, बीड, लातूर व नांदेड जिल्ह्यांत मात्र सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत पुढे जाऊन रब्बी पेरणी झाली आहे.

पीकनिहाय झालेली पेरणी (क्षेत्र हेक्‍टरमध्ये) ः रब्बी तृणधान्ये ः ८,६५,६०१, रब्बी कडधान्ये ः ८,३४,७९९, रब्बी गळीतधान्ये ः ३१,१६८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT