अॅग्रोवनच्या प्रतिनिधींचा पुरस्काराने गौरव करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अॅग्रोवनच्या प्रतिनिधींचा पुरस्काराने गौरव करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
मुख्य बातम्या

सत्ता निरंकुश होऊ न देण्यासाठी माध्यमांनी सजग असावे : मुख्यमंत्री फडणवीस

टीम अॅग्रोवन

मुंबई  : सत्ता निरंकुश होऊ न देण्यासाठी माध्यमांनी सजग असले पाहिजे. ही भूमिका त्यांनी जबाबदारीने पार पाडावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (ता.२७) पत्रकारिता पुरस्कारांचे यशवंतराव प्रतिष्ठान येथे वितरण झाले. त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रीय स्तरावर पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाऱ्या महाराष्ट्रीयन पत्रकारास यंदापासून अटलबिहारी वाजपेयी पत्रकारिता पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी केली.

या कार्यक्रमात २०१७ आणि २०१८ साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार अनुक्रमे ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे आणि ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी प्रदान केला. प्रत्येकी एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २०१६ साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार दैनिक हितवादचे संपादक विजय फणशीकर यांना जाहीर झाला आहे. 

पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या प्रती आदरभाव व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे. काही ज्येष्ठ पत्रकारांना धनादेशाचे वितरण करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी या योजनेचा प्रारंभ केला. तसेच कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते विविध पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण झाले. प्रत्येकी ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. पुरस्कारार्थींमध्ये सकाळ माध्यम समूहाच्या सकाळ आणि ॲग्रोवनच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की शासकीय व्यवस्था शेवटच्या माणसापर्यंत पोचविणे, सर्वसामान्यांचा आवाज शासनापर्यंत पोचविणे, यासोबतच समाजप्रबोधनाच्या कार्यात माध्यमांनी मोठे योगदान दिले आहे. पण आता माध्यमांचा संक्रमण काळ सुरू आहे. मुद्रित माध्यमांपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांपर्यंत झाला आहे. या संक्रमणावस्थेतही माध्यमांनी आपली मूल्ये कायम जपली पाहिजेत. बातम्यांद्वारे अफवा पसरल्यास त्यातून समाजस्वास्थ्य बिघडते. त्यामुळे अशा संक्रमणाच्या काळात मूल्याधिष्ठित पत्रकारिता करून माध्यमांनी विश्वासार्हता जपावी. 

यावेळी माहिती आणि जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संचालक (माहिती) सुरेश वांदिले यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT