उजनी धरणातील पाणी प्रदूषितच : विद्यापीठाचे स्पष्टीकरण
उजनी धरणातील पाणी प्रदूषितच : विद्यापीठाचे स्पष्टीकरण 
मुख्य बातम्या

उजनी धरणातील पाणी प्रदूषितच : विद्यापीठाचे स्पष्टीकरण

टीम अॅग्रोवन

सोलापूर  : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यांतील ५१ गावे आणि ४७ हजार कुटुंबं बाधित झाली आहेत. दुसरीकडे पुण्यातून उजनी धरणात येणाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर कारखान्यांसह परिसरातील घाण येते. त्यामुळे धरणातील पाणी प्रदूषित झाले असून ते पाणी पिण्यास अपायकारकच आहे, असा निष्कर्ष सोलापूर विद्यापीठाने केलेल्या पहिल्या टप्प्यातील संशोधनातून निघाला आहे. परंतु, सोलापूर शहराला उजनीतून होणाऱ्या पाण्याशी संशोधनाचा काही संबंध नाही, असे स्पष्टीकरण विद्यापीठाकडून देण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यातील शेती, जनावरे व शहरातील नागरिकांना उजनी धरणातून पाणीपुरवठा होतो. त्या पार्श्‍वभूमीवर धरण प्रदूषणमुक्‍त करण्यासाठी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या पुढाकारातून संशोधन केले जात आहे. पहिल्या टप्प्यातील संशोधनाच्या पार्श्‍वभूमीवर शहराला मिळणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा दावाही विद्यापीठाकडून करण्यात आला होता. दरम्यान, संशोधक विद्यार्थ्यांनी महापालिका आयुक्‍त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेतली. त्यानंतर शहरातील पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याच्याशी या संशोधनाचा काही संबंध नसल्याचा खुलासा विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आल्याने आर्श्‍चय व्यक्‍त होत आहे.

दोन महिन्यांत पुढील संशोधन उजनी धरणातील पाणी थेट शेतीला दिल्यास उत्पादकता घटते. जनावरे अथवा नागरिकांनी ते पाणी थेट पिल्यास त्यातून आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्या पार्श्‍वभूमीवर आता धरण क्षेत्रातील कुटुंबांचा सर्व्हे केला जाणार असून दोन महिन्यांत संशोधन होईल, अशी माहिती संशोधक प्रमुख प्रा. डॉ. गौतम कांबळे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT