पाशा पटेल
पाशा पटेल 
मुख्य बातम्या

स्वामिनाथन आयोगामुळे केवळ दीडपट फायदा ः पाशा पटेल

टीम अॅग्रोवन

नागपूर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशावेळी स्वामिनाथ आयोगाची अंमलबजावणी झाल्यास फक्‍त दीडपटच भाव मिळेल. दीडपटपेक्षा दोनपट नक्‍कीच जास्त असल्याने शेतकऱ्यांच्या फायद्याचे काय राहील, हे तुम्हीच सांगा? असा प्रतिसवाल राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला भाव मिळेल, सोयाबीन, सूर्यफुलाच्या आयातीवरही शुल्क लावण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा मालही निर्यात होत आहे. त्यास शासानाकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. सध्या शेतमालाचे भाव हमीभावाच्या वर गेले नसले तरी भविष्यात या धोरणाचा फायदा होणार असल्याचेही पटेल म्हणाले. आयात आणि निर्यातीवर मर्यादांची गरज आहे. मॉइश्‍चरमुळे सोयाबीनला भाव कमी मिळतो. १८ पेक्षा जास्त ओल असलेल्या सोयाबीनला तीन हजार रुपये भाव कसा देता येईल, असाही सवाल त्यांनी केला. हरभऱ्यासाठी चार हजार ४०० रुपये भाव देण्यात आला, असे सांगताना राज्य कृषिमूल्य आयोगाकडून पाठविण्यात आलेल्या शिफारसी आपणास ठाऊक नसल्याचेही पटेल यांनी सांगितले. सोयाबीनला येत्या काळात चांगला भाव मिळेल, त्याकरिता सोयाबीन विक्रीची घाई शेतकऱ्यांनी करू नये, टप्प्याटप्प्याने सोयाबीन बाजारात आणले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chilli Cultivation : धाड परिसरात शेकडो हेक्टरवर यंदा झाली मिरचीची लागवड

Jharkhand Rain Update : झारखंडमध्ये अवकाळीचा कहर; वीज पडून पाच तर झाड कोसळून दोघांचा मृत्यू 

Water Agitation : हंडा घेऊन महिला धडकल्या सिंचन विभागाच्या कार्यालयावर

Loksabha Election 2024 : धाराशिवमध्ये मोठी चुरस

Liger Pesticide : ‘जीएसपी’चे कीटकनाशक ‘लायगर’ बाजारात

SCROLL FOR NEXT