पुण्यात पंचनामे गतीने सुरू Panchnama started in Pune at a fast pace
पुण्यात पंचनामे गतीने सुरू Panchnama started in Pune at a fast pace 
मुख्य बातम्या

पुण्यात पंचनामे गतीने सुरू

टीम अॅग्रोवन

पुणे : जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे करण्यास वेग आला आहे. त्यामुळे गेल्या तीन चार दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीचे नुकसान समोर येऊ लागले आहे. जिल्ह्याच्या विविध भागात शेत, पिके वाहून जाणे, दरडी कोसळणे, भूस्खलन होणे आदी घटना समोर आल्या आहेत. आणखी तीन चार दिवसांत नुकसानीची माहिती समोर येऊन भरपाईचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.   गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम भागातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. खेड तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी पट्ट्यातील एकलहरे येथील बांगरवाडीच्या डोंगराला अतिवृष्टीमुळे सुमारे दोनशे ते अडीचशे फुटाची भेग पडली. त्यातून डोंगर खचून भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या तीन कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. काही दिवसांपासून ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे भातशेतीसह शेतशिवाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे डोंगराळ भागातील जमिनींना तडे जाऊन भूस्खलन होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. भूस्खलनाच्या भीतीने डोंगरपायथ्याशी वास्तव्य करणाऱ्या तीन कुटुंबांचे संभाव्य धोका टाळण्यासाठी स्थलांतर केले आहे.   दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील पश्‍चिम भागातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. या वेळी पाटील म्हणाले,‘‘ कोणत्याही परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकरी मदतीविना वंचित राहता कामा नये. त्यासाठी तातडीने पंचनामे करा,’’ या भागात अजूनही पाऊस सुरू आहे. शेकडो शेतकऱ्यांची भात शेती वाहून गेली आहे. पोखरी घाटात दरडी पडल्याने भीमाशंकरपर्यंत संपर्क तुटला होता. प्रशासनाचे दरडी काढण्याचे काम चालू आहे. गोहे, मेघोली, कुशिरे, पाटण परिसरातील रस्त्यांवरही दरडी पडल्याने संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. आदिवासी भागात पावसाने शेतकऱ्यांच्या जमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. वळसे पाटील यांनी शिनोली, फदालेवाडी, उगलेवाडी, डिंभे, गोहे बुद्रूक, गोहे खुर्द या भागाचा दौरा केला.  नुकसानग्रस्तांनी मदतीची मागणी केली आहे.

प्रतिक्रिया पावसाने वांद्रे, पिंपरी, भोरकस, वडुस्‍ते, अहिरवाडी परिसरातील शेतांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांसोबत शेतांचे बांधही वाहून गेले. काही लोक वर्षांनुवर्षे टाटा कंपनीची जमीन कसत आहेत. त्‍यांच्या पिकांचेही नुकसान झाले आहे. -प्रकाश ढमाले, वांद्रे (ता. खेड), शेतकरी   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT