paddy_Pune_nuksan_1.jpg
paddy_Pune_nuksan_1.jpg 
मुख्य बातम्या

रत्नागिरीतील १५०३ गावांची पैसेवारी ५० पेक्षा अधिक

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी : खरीप हंगामात भातपीक घेणाऱ्या गावातील ३१ ऑक्टोबरपर्यंतची सुधारित हंगाम पीक पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात एकूण १ हजार ५३८ गावांपैकी १ हजार ५०३ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आहे. ३५ गावांमध्ये भातपीक घेतले जात नसल्याने त्या गावांची पैसेवारी जाहीर केलेली नाही.

पीक पैसेवारी हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासनाकडून शेतकऱ्याला मिळणारे विविध प्रकारचे साह्य हे पीक पैसेवारीवरच अवलंबून असते. मागील दहा वर्षांच्या कालावधीत तीन उत्तम उत्पन्नाची सरासरी हे त्या शेतकऱ्याचे उत्पन्न समजले जाते. कृषी विभागाकडून काढलेल्या या उत्पन्नाचे मूल्यांकन १०० पैसे समजले जाते. पाहणी केलेल्या हेक्टरी उत्पादन आणि प्रमाण उत्पादन याच्या आधारावर ही पैसेवारी काढण्यात येते.

ज्या गावातील पैसेवारी ५० पैसे किंवा त्याहून कमी असेल, तर त्या गावातील जमीन महसुलात सूट देण्यात येते. असे क्षेत्र टंचाईग्रस्त क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येते. मात्र सरसकट शेतकऱ्यांना सरसकट सवलती देण्यात येत नाही. काही शेतकऱ्यांच्या विहिरी असल्याने त्या पाण्यावर बागायती शेती करू शकतात. त्यामुळे अल्पभूधारक आणि छोट्या शेतकऱ्यांनाच टंचाईसंबंधीच्या सर्व सोयी देण्यात येतात. टंचाई परिस्थितीत वीजबिलाची थकबाकी असली तरीही त्यांचा विद्युत प्रवाह खंडित करू नये, असे आदेश शासनाकडून देण्यात आलेले आहेत.

३५ गावांमध्ये भातपीकच नाही... जिल्ह्यात ३१ ऑक्टोबरला सुधारित हंगामी पीक पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र यंदाही १५३८ गावांपैकी १५०३ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा अधिक आहे. अंतिम पैसेवारी १५ डिसेंबरला जाहीर होईल. ३५ गावांमध्ये भातपीकच नाही. त्यात दापोली ३ खेडमधील १, रत्नागिरीतील १७, संगमेश्‍वरमधील ४ आणि राजापूर तालुक्यातील १० गावांचा समावेश आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT