सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया फेडरेशन ( रोमिफ ) या संस्थेतर्फे राज्यस्तरीय सेंद्रिय धान्य महोत्सव व सेंद्रिय शेती परिषद सांगलीत होणार आहे. जैन कच्छी भवनमध्ये शनिवारी व रविवारी (ता.२३ व २४ ) होईल. या वेळी ‘ॲग्रोवन'चे संपादक आदिनाथ चव्हाण यांच्यासह पाच जणांचा कृषिक्षेत्रातील पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेच्या उपाध्यक्षा मनीषा पाटील यांनी दिली. देशी वाणांच्या बियाण्यांची बॅंक बनवणाऱ्या राहीबाई पोपेरे, कृषी संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसाडीकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील या वेळी उपस्थित राहतील. मनीषा पाटील म्हणाल्या, की रसायनमुक्त शेती करणारे शेतकरी आणि शेतीतज्ज्ञांनी ‘रोमिफ'ची स्थापना केली आहे. शेतीत रसायनांचा बेसुमार वापर वाढल्याने मानवी जीवन धोक्यात आले आहे. त्यावर उपाय म्हणून सेंद्रिय शेतीचा प्रसार आवश्यक आहे. सांगलीत प्रथमच या अनुषंगाने सेंद्रिय शेती परिषद होत आहे. शनिवारी उद्घाटन व डॉ. कौसाडीकर, राहीबाई पोपेरे, प्रदीप कोठावदे, संजय देशमुख, प्रशांत नाईकवडी, संजय अदाटे या कृषितज्ज्ञांची व्याख्याने होतील. रविवारी शेतकरी व खरेदीदारांचे संमेलन होईल. तत्पूर्वी कृषीप्रक्रिया उद्योगांविषयी संशोधक व शासकीय अधिकारी माहिती देतील. सेंद्रिय धान्य महोत्सवात ग्राहकांना रसायनमुक्त उत्पादने मिळतील.
महोत्सवात याचा समावेश मेळघाटातील आदिवासींचा हातसडीचा तांदूळ, नैसर्गिक गहू व खपली, सोलापूरची मालदांडी ज्वारी, पॉलिश न केलेल्या डाळी व कडधान्ये, डोंगराळ भागातील जोंधळा, दोडका व जिरगा तांदूळ, सेंद्रिय प्रमाणित धान्ये, लाकडी घाण्यातून उत्पादित तेले, रसायनमुक्त बेदाणा, सेंद्रिय शेंगदाणे व नैसर्गिक मध, सेंद्रिय भाज्या इत्यादी. पुरस्काराचे मानकरी
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.