Order of crop panchnama in Solapur district
Order of crop panchnama in Solapur district 
मुख्य बातम्या

सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या पंचनाम्यांचे आदेश

टीम अॅग्रोवन

सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग पाऊस झाला. या पावसामुळे खरिपातील मूग, उडीद भिजला, तर ऊस, कांदा, डाळिंब पिकांचेही मोठे नुकसान झाले. प्रामुख्याने माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला तालुक्याला त्याचा सर्वाधिक फटका बसला. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले. आठवडाभरात या पंचनाम्याचे अहवाल देण्यास सांगितले आहे. 

होटगी (ता. दक्षिण सोलापूर) तलाव भरल्याने सांडव्यातून पाणी वाहत आहे. अक्कलकोट तालुक्यातील चुंगी, मंगळवेढा तालुक्यातील मारापूर, सांगोला तालुक्यातील तिप्पेहळ्ळी, अनकढाळ, वझरे, मिसाळवाडी, राजुरी, वाटंबरे, एखतपूर या भागात डाळिंब, कांदा भाजीपाला पिकासह अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.

पंढरपूर तालुक्यातही पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पंढरपुरातील कासेगाव, खर्डी येथील द्राक्ष, डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे. 

जमीन खरडली, उडीद, मूग भिजला

पावसामुळे अनेकांच्या शेतातील माती वाहून गेली आहे. त्याशिवाय उपरी, सुपली, पळशी येथेही दमदार पावसाने शेतीचे नुकसान झाले. अनेकांचा काढलेला मूग, उडीद भिजून गेला. माळशिरस तालुक्यातही वेळापूर, माळशिरस, निमगाव, मळोली, अकलूज भागात चांगला पाऊस झाला. या भागातही डाळिंबासह ऊसाचे नुकसान झाले. दरम्यान, आता या सर्व नुकसानीचे पंचनामे करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी तहसिलदारांना दिले आहेत. येत्या आठ दिवसांत त्याबाबतचा अहवाल द्यावा, असेही त्यांनी म्हंटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT