नाशिक जिल्ह्यात पावसामुळे उन्हाळ कांद्याची रोपे झाली खराब
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे उन्हाळ कांद्याची रोपे झाली खराब 
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात पावसामुळे उन्हाळ कांद्याची रोपे झाली खराब

टीम अॅग्रोवन

नाशिक  : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे उन्हाळ कांद्याची रोपे खराब होत आहेत. परिणामी उन्हाळ कांदा लागवडीसाठी रोपांचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवण्याची शक्यता आहे. 

चांगल्या दराच्या अपेक्षेने कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. आगामी उन्हाळ कांदा लागवडीसाठी टाकलेल्या रोपांचे पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकरी मिळेल तेथून कांद्याची रोपे खरेदी करीत आहेत. परिणामी कांदा लागवडीचा खर्च दुपटीने वाढला आहे. जिल्ह्यातील देवळा, कळवण, चांदवड व येवला तालुक्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने कांदा रोपांचे नुकसान होऊ लागले आहे. पाऊस अधिक झाल्याने जास्त काळ रोपांमध्ये पाणी साचून राहिल्याने रोपांची जागेवर कूज झाली. वातावरणात आर्द्रता अधिक राहिल्याने रोपांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे. अनेक ठिकाणी टाकलेली रोपे विरळ झाली असून काही ठिकाणी करप्याचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. रोपे टाकल्यानंतर पावसाने ओढ दिली होती; मात्र पुन्हा जोरदार पाऊस झाल्याने उन्हाळ कांद्यासाठी टाकलेले उळे खराब होत आहेत. त्यातच उन्हाळ कांद्याची रोपे व बियाणे आता शिल्लक नाही, त्यामुळे पर्यायी पीक म्हणून शेतकरी गहू पेरणीचा निर्णय घेत आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Dam : कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, शेतीसाठी दोन आर्वतने मिळणार?

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

SCROLL FOR NEXT