राज्यात तुरळक पावसाचा अंदाज
राज्यात तुरळक पावसाचा अंदाज 
मुख्य बातम्या

राज्यात तुरळक पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे : पोषक हवामानाअभावी राज्यात पावसाने दडी मारली आहे. पावसाची उघडीप आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता असून, बुधवारपर्यंत (ता. १४) राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले असून, माॅन्सनचा आस असलेल्या कमी दाब पट्ट्याचा पश्‍चिमेकडील भाग उत्तरेकडे सरकला आहे, तर पूर्वेकडील भाग सर्वसाधारण स्थितीमध्ये आहे. पुढील पाच दिवस हीच स्थिती राहणार असल्याने उत्तर भारतातील राज्यात पावसाचा जोर अधिक राहणार अाहे. तर आठवडाभर राज्यात पावसाची उघडीप कायम राहणार असून, तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल. मंगळवारी (ता. १३) बंगालच्या उत्तर भागात नवीन कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. यातच १३ ते १५ ऑगस्ट रोजी मॉन्सूनचे प्रवाह सक्रीय होऊन कोकण, घाटमाथा, केरळ, कर्नाटकमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता अाहे.  शुक्रवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. तर मराठवाडा, विदर्भात मुख्यत: कोरडे हवामान होते. राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये, स्राेत- कृषी विभाग) :  कोकण : भाईंदर २२, धसई २१, महाड २३, बिरवडी २६, नाटे २५, खारवली २३, खामगाव २२, मेंढा ३१, दाभाेळ २१, अबलोली २०, सावंतवाडी २१, आंबोली ३५, तलेरे २६, कडूस २२, कोणे २२. मध्य महाराष्ट्र : इगतपुरी ३५, घोटी २१, धारगाव ३२, वेळुंजे २१, शेंडे ६१, माले २३, मुठे २६, लोणावळा २३, राजूर २१, हेळवाक २६, तापोळा ५७, लामज ७२, आंबा ४७, राधानगरी २२, गगणबावडा ४३, साळवण ८१.  मराठवाडा : मंथा २१, बामणी १५, चारठाणा १६. विदर्भ : मेरा २४, धूळघाट ३१, सावळीखेडा २२, नांदगाव २३, लोणी २०, रोहणा २८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT