शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

टीम अॅग्रोवन

उमरखेड, जि. यवतमाळ : इसापूर धरणाचे पाणी सिंचनकामी पैनगंगा नदीत सोडण्याच्या मागणीसाठी कोरड्या नदीपात्रात गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. सोमवार (ता. १९) पासून सुरू असलेल्या या आंदोलनाची प्रशासनाकडून दखल न घेण्यात आल्याने आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

यंदा पावसाळा लवकरच आटोपला. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत पैनगंगा नदीपात्रात साठलेले पाणी लवकरच आटल्याने ऐन रब्बी हंगामात नदी कोरडी पडली. त्यामुळे पैनगंगेच्या पाण्यावर विसंबून असणाऱ्या नदीकाठच्या पाच हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिके धोक्‍यात आली. त्याची दखल घेत सिंचनासाठी विशेष तरतूद म्हणून इसापूर धरणातील दहा टीएमसी पाणी पैनगंगेत सोडावे. त्यासाठी पैनगंगेला इसापूर धरणाचा तिसरा कालवा घोषित करावा, ज्या तरतुदीनुसार उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून सिंचनासाठी उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येते, तशीच तरतूद नदीपात्रात धरणाचे पाणी सोडण्यासाठी करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

या मागण्यांच्या पूर्ततेसाठी यवतमाळ व नांदेड जिल्हयातील शेतकऱ्यांनी कोरड्या नदीपात्रातच धरणे आंदोलन सुरू केले आहे. खासदार राजीव सातव यांनी आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा दर्शविला. परंतु प्रशासनकडून आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने आंदोलकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र रोष निर्माण झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Dam : कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, शेतीसाठी दोन आर्वतने मिळणार?

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

SCROLL FOR NEXT