नागपूर ः येथे झालेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणी बैठकीला उपस्थित पदाधिकारी.
नागपूर ः येथे झालेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणी बैठकीला उपस्थित पदाधिकारी. 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात संघटित होण्याची गरज ः घनवट

टीम अॅग्रोवन

नागपूर : शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतीधंदा उद्‍ध्वस्त झाला आहे. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढते आहे. कर्जमाफीसाठी तारखांवर तारखा दिल्या जात आहेत. वीज कनेक्‍शन तोडणीसाठी मोहीम राबविली जाते. अशा अन्यायाविरोधात आता संघटित होण्याची गरज अाहे, असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी व्यक्‍त केले.

नागपूर येथे कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. या वेळी श्री. घनवट पुढे म्हणाले, की शासन शेतीमालाच्या आधारभूत किमती जाहीर करते, मात्र आधारभूत किमतीनुसार शेतमाल खरेदी करण्यासाठी शासनाकडे पुरेशी व्यवस्था व पैसा नाही. छत्तीसगड राज्याचा पॅटर्न यावर प्रभावी ठरणार असल्याने त्याच्या अनुकरणाची गरज आहे.

छत्तीसगडमध्ये आधारभूत किमतीमधील फरक सरकारकडून दिला जातो. महाराष्ट्रात मात्र सरकारच्या लुटीच्या धोरणामुळे शेती तोट्यात गेली आहे. भारतीय शेती व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी शेतीला स्वातंत्र्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी महिला आघाडी अध्यक्षा गीता खांदेभराड, युवा आघाडी अध्यक्ष सतीश दाणी, सीमा नरोडे, राम नेवले, वामनराव चटप, पुखराज रेवतकर, सरोजताई काशीकर, अशोक भेदे अादी उपस्थित होते.  

१२ डिसेंबरला शेतकरी मेळावा शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चेकरिता १२ डिसेंबर रोजी शेगाव येथे शेतकरी स्वातंत्र्य मेळावा आयोजित केला अाहे. राज्यभरातून पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचे घनवट यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT