ajit pawar
ajit pawar  
मुख्य बातम्या

अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे : अजित पवार

टीम अॅग्रोवन

पंढरपूर, जि. सोलापूर : कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (ता.२६) श्री विठ्ठल-रुक्मिणी देवीच्या चरणी घातले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासमवेत कवडुजी भोयर आणि त्यांच्या पत्नी सौ. कुसूमबाई भोयर (डौलापूर-हिंगणघाट, जि. वर्धा) या वारकरी दांपत्याला महापूजेचा मान मिळाला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सौ. सारिका भरणे, पार्थ पवार, जय पवार आदी उपस्थित होते. श्री. पवार म्हणाले, की अवघ्या जगासमोर कोरोनाचे आव्हान आहे. आपण या आव्हानाला सक्षमपणे तोंड देत आहोत. पण गेला काही काळ कोरोना आटोक्यात आला, असे चित्र होते. मात्र गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण परत वाढत आहेत. त्यामुळे आपणा सर्वांनाच काही बंधने पाळणे गरजेचे आहे. यानिमित्ताने वारकरी बांधवांचे आभार मानतो, कारण त्यांनी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आषाढी यात्रेप्रमाणे कार्तिक यात्रेतही प्रतिसाद दिला. राज्यातील समस्त नागरिकांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा करण्याचे मला भाग्य मिळाले. माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे, असे ते म्हणाले.  या वेळी समितीचे सदस्य ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे, पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी उपस्थित होते. दरवर्षी कार्तिकी वारीला चंद्रभागेच्या वाळवंटासह अवघी पंढरी वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेलेली असते. पण यंदा कोरोनामुळे आषाढीप्रमाणेच कार्तिकी वारीलाही पंढरीत वारकऱ्यांना येण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे नुसती नीरव शांतता होती.   मानाच्या वारकऱ्यांचा सन्मान श्री. पवार यांच्या हस्ते मानाचे वारकरी कवडुजी नारायण भोयर आणि सौ. कुसुमबाई कवडुजी भोयर (मु.डौलापूर, पो.मोझरी, ता. हिंगणघाट, जि. वर्धा) यांना राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात येणारा प्रवास सवलत पास सुपूर्त करत सत्कार करण्यात आला.

शेतकऱ्यांचं दुःख हलकं कर  राज्यातील शेतकरी यंदाच्या वर्षी अतिवृष्टीनं संकटात आला आहे. आम्ही त्यांना साह्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो आहोतच. पण शेतकऱ्यांच्या जीवनातील दु:ख हलके करण्याची ताकद शासनाला आणखी दे, अशीही प्रार्थना आपण विठ्ठलाकडे केल्याचे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT