मुंबईतून आजपासून ५० विमानांची ये-जा
मुंबईतून आजपासून ५० विमानांची ये-जा 
मुख्य बातम्या

मुंबईतून आजपासून ५० विमानांची ये-जा

टीम अॅग्रोवन

मुंबई : देशांतर्गत विमान उड्डाणे उद्यापासून सुरू होणार आहेत. देशभरातून दररोज १०५० विमानांचे उड्डाण होणार आहे. त्यापैकी २५ विमाने मुंबईतून झेप घेतील व तेवढ्याच विमानांना उतरण्याची परवानी देण्यात आली आहे.

केंद्रिय नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सोमवार (ता.२५) पासून देशांतर्गत विमानसेवा मर्यादित प्रमाणात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूने विरोध दर्शविला होता. पहिल्यांदा तमिळनाडूने विमान उड्डाणांची तयारी दर्शविली, त्यानंतर आता महाराष्ट्राने तयारी दर्शविली आहे. पश्चिम बंगालने मात्र थोडी मुदत मागितली आहे. देशभरातील १३ राज्यांनी यासाठीची स्वतंत्र नियमावली केली असून, त्यानुसार विमानांतून येणाऱ्या प्रवाश्‍यांना १४ दिवस क्वारंटाइन करण्यात येणार आहे.

मुंबई विमानतळावरून दैनंदिन २५ विमानांच्या उड्डाणांना आणि २५ विमाने उतरण्यास परवानगी दिल्याची माहिती कौशल्य व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. मुंबई विमानतळावरून दैनंदिन सुमारे ९५० विमाने उडण्याची क्षमता आहे. त्याप्रमाणे जास्तीत जास्त विमाने उडवण्याचा केंद्राचा प्रयत्न होता. त्यासाठी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांनी देशातील सर्व विमानतऴ प्रशासनाला सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. मात्र महाराष्ट्र सरकारने मुंबईतील कोरोना बाधितांची वाढती संख्या आणि प्रवासी वाहतुकीचे आव्हान लक्षात घेता या विमानसेवेवर आक्षेप घेतला होता.

राज्याची नियमावली लवकरच सुरूवातीच्या टप्प्यात मर्यादित स्वरूपात प्रवासी विमानांचे उड्डाण होणार आहे. त्यानंतर हळूहळू त्यात वाढ केली जाणार असून, लवकरच राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात येणार आहे, असे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT