अखिल भारतीय किसान सभेचा चलो दिल्लीचा नारा Let's go to Delhi's slogan of Akhil Bharatiya Kisan Sabha 
मुख्य बातम्या

अखिल भारतीय किसान सभेचा चलो दिल्लीचा नारा

अखिल भारतीय किसान सभेकडून आपल्या मागण्या आणि दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून चलो दिल्लीचा नारा देण्यात आला आहे. किसान सभेचे कार्यकर्ते व शेतकरी दिल्लीकडे कूच करणार आहेत, अशी घोषणा करण्यात आली आहे.

टीम अॅग्रोवन

नाशिक  : केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे, शेतकरी विरोधी प्रस्तावित वीजबिल विधेयक मागे घ्यावे व शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाचे संरक्षण मिळावे, यासाठी केंद्रीय कायदा करावा, अशी मागणी किसान सभेची आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीत सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनाला आणखी व्यापक आणि तीव्र करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेकडून चलो दिल्लीचा नारा देण्यात आला आहे. किसान सभेचे कार्यकर्ते व शेतकरी दिल्लीकडे कूच करणार आहेत, अशी घोषणा करण्यात आली आहे.   या बाबत घोषणा करण्यासाठी शुक्रवार (ता.१८) पत्रकार परिषद पार पडली. या वेळी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे किसान सभेचे माजी राज्य अध्यक्ष व माजी आमदार जे. पी. गावीत, राज्य अध्यक्ष किसन गुजर, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, राज्य सहसचिव सुनील मालुसरे, सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड आदी या वेळी उपस्थित होते. त्यांनी पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला. सोमवारी (ता.२१) रोजी नाशिक येथे जथ्थे दिल्लीकडे रवाना होणार आहेत.  देश विदेशातील मोठे उद्योगपती यांना फायदा व्हावा, यासाठी केंद्राने कायदे आणले, ती शेतकऱ्यांची मागणी नव्हती. आता शेतकरी या मुद्द्यावर संतप्त होऊन आंदोलन करीत आहेत. मात्र केंद्र सरकारने बळाचा वापर करून शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील हजारो शेतकरी थेट दिल्लीत जाऊन सामील होणार असल्याचे डॉ. ढवळे यांनी यावेळी सांगितले.   

सोमवारी होणार कूच  सोमवारी (ता. २१) रोजी नाशिक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्राचे हजारो शेतकरी शेकडो वाहनांमधून दिल्लीच्या आंदोलनात सामील होण्यासाठी निघणार आहेत. १ हजार २६६ किलोमीटरचा प्रवास करून २४ डिसेंबर २०२० रोजी दिल्ली येथील सीमेवर पोहोचतील. देशभरातून दिल्लीतील आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील शेतकरीही रेशन-पाणी, स्वयंपाक व बिछाना घेऊन बेमुदत आंदोलनाच्या तयारीने दिल्लीला जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. 

असे आहे चलो दिल्ली कार्यक्रम  जिल्ह्यांमधील शेतकरी सोमवारी, २१ डिसेंबर रोजी गोल्फ क्लब मैदान येथे दुपारी १२ वाजता जमतील. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दुपारी एक वाजता दिल्लीच्या दिशेने निघतील. केंद्र सरकार व त्यांचे कॉर्पोरेट भागीदार विरोधात असल्याने वाहन जत्था दिल्लीला निघण्यापूर्वी नाशिकमधील रिलायन्स पेट्रोल पंपावर जोरदार निदर्शने करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT