Jalna to become major bamboo center in the country: Patel
Jalna to become major bamboo center in the country: Patel 
मुख्य बातम्या

जालना बांबू लागवडीचे देशातील मोठे केंद्र बनेल : पटेल

टीम अॅग्रोवन

जालना : ‘‘उद्योजकांनी आपल्या आवाहनाला प्रतिसाद देत, बांबू वापरासाठी लक्ष घातले. या पर्यावरणपूरक चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनातर्फे आवश्यक ती मदत देऊ. शेतकऱ्यांसह उद्योजकांचा वाढता प्रतिसाद पाहता जालना हे बांबू लागवडीचे देशातील सर्वात मोठे केंद्र बनेल,’’ असा विश्वास महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केला.

शनिवारी (ता. १६) रात्री ८ वाजता पोलाद स्टील कंपनीत पटेल यांच्या उपस्थितीत बैठक झाली. संतोष करपे, उद्योजक नितीन काबरा, सुनील गोयल, भरत मंत्री, कृष्णा काबरा, अतुल लड्डा, डॉ. सुयोग कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. या वेळी पोलाद स्टीलच्या रिहिटिंग फरनेसेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर बांबू वापराचा प्रारंभ पटेल यांच्या उपस्थितीत करण्यात आला. 

बॉयलरमध्ये दगडी कोळशाऐवजी पर्यावरणपूरक बांबूंचा री-रोलिंग कंपनी मालकांनी वापर करावा, असे आवाहन पटेल यांनी केले. या आवाहनाला उद्योजकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्याचे पहिले पाऊल म्हणून पोलाद स्टील कंपनीच्या रिहिटिंग फरनेसेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर बांबूचा वापर सुरू झाला आहे. 

एमआयडीसी आणि मोतीबाग परिसरातील १०० एकर मोकळ्या जागेवर बांबू लागवड करण्याचा विचार सुरू आहे. त्यादृष्टीने पटेल आणि उद्योजकांनी या परिसराची पाहणी केली. 

लड्डा म्हणाले, ‘‘पर्यावरण संरक्षणासाठी बांबू लागवड ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे. जालन्यातील उद्योजक आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या संकल्पनेला उस्फूर्त प्रतिसाद देणे सुरू केले आहे. त्यामुळे बांबूसाठी बाजारपेठ उपलब्ध होईल. बियाणे नगरीप्रमाणे बांबू सिटी म्हणून जालन्याची जागतिक ओळख बनेल, असा विश्वास आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT