विशाखापट्टणम, अांध्र प्रदेश ः शेती क्षेत्राला सक्षम बनविणे अाणि शाश्वत शेतीसाठी पीक विविधतेसह तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्यायला हवा. तसेच शेतीच्या विकासासाठी व्यापक दृष्टिकोनाची गरज अाहे, असे मत उपराष्ट्रपती एम. एम. वेंकय्या नायडू यांनी येथे व्यक्त केले.
अन्नधान्यावरील सर्व निर्बंध काढून टाकायला हवेत; जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालास किफायतशीर दर मिळेल, असेही त्यांनी म्हटले अाहे.
‘अांध्र प्रदेश ॲग्रीटेक समीट’च्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अायोजन अांध्र प्रदेश सरकार अाणि बिल अाणि मेलिंदा गेटस फाउंडेशनने केले अाहे. यावेळी अांध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू, कृषिमंत्री सोमीरेड्डी चंद्रमोहन रेड्डी, बिल गेटस फाउंडेशनचे दक्षिण अाशियातील प्रमुख पूर्वी मेहता अादी उपस्थित होते.
श्री. नायडू पुढे म्हणाले, की पीक विविधतेत बदल करणे, मूल्यवर्धित, अन्न प्रक्रिया, चांगली विपणन व्यवस्था, अाहारातील बदलत्या सवयी याकडे लक्ष देण्याची गरज अाहे. पीक विविधतेसह फलोत्पादन, रेशीम शेती, कुक्कटपालन, दुग्ध अादी पूरक व्यवसायाकडे वळण्याची गरज अाहे.
शेतीच्या विकासासाठी व्यापक दृष्टिकोनाची गरज अाहे. शेतकऱ्यांसोबत काम करून तंत्रज्ञानात वाढ करायला हवी. यामुळे पीक उत्पादकता वाढेल.
- एम. वेंकय्या नायडू, उपराष्ट्रपती