grampanchayat
grampanchayat  
मुख्य बातम्या

गावपातळीवरील अस्तित्वासाठी नेत्यांचा ‘सवता सुभा’ 

टीम अॅग्रोवन

नगर ः जिल्हा आणि राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या नेत्यांचा सध्या गाव पातळीवरील ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून ‘अस्तित्व’ सिद्ध करण्यासाठी धडपड सुरू आहे. त्यासाठी नेत्यांनी गावपातळीवर कार्यकर्ते सक्रिय केले आहेत. वरिष्ठ पातळीवर पक्षीय युती असलेल्या नेत्यांनी गाव पातळीवर मात्र ‘सवता सुभा’ तयार केला आहे. विशेष म्हणजे काही ग्रामपंचायतीत राजकीय पक्षांची अधिक चिन्हे नसली, तरी आपल्याला मर्जीतल्या कार्यकर्त्यांचे ‘पॅनेल’ तगडे होण्यासाठी पाठबळ दिल्याचे दिसून येत आहे. 

मुदत संपलेल्या परंतु कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे रखडलेल्या राज्यात १४ हजार, तर नगर जिल्‍ह्यात ७४७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर नेतृत्व करणारे बहुतांश नेते गावपातळीवर नेतृत्व करूनच पुढे गेलेले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर या नेत्यांचे बारकाईने लक्ष असते. सध्या राज्याच्या सरकारमध्ये काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी अशी युती आहे. गाव पातळीवर मात्र या पक्षांच्या नेत्यांचे वेगवेगळे गट आहेत. वरिष्ठ पातळीवरील नेते सत्तेसाठी एकत्र झाले असले, तरी गावपातळीवर मात्र आपापले गट वेगवेगळे आणि शाबूत असल्याचे सध्या सुरू असलेल्या राजकीय हालचालींवरून दिसून येत आहे. 

ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर पक्षीय युती असलेल्या नेत्यांनी गाव पातळीवर मात्र ‘सवता सुभा’ तयार केला आहे. विशेष म्हणजे काही ग्रामपंचायतीत राजकीय पक्षांची अधिक चिन्हे नसली, तरी आपल्याला मर्जीतल्या कार्यकर्त्यांचे ‘पॅनेल’ तगडे होण्यासाठी पाठबळ दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुका करण्याचे आवाहन केले जात असले, तरी गावपातळीवरील नेत्यांच्याच गटाचा बिनविरोधला अडथळा येत असल्याचे एका कार्यकर्त्यांनी सांगितले. 

संगमनेर, राहात्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात विरुद्ध भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील, जामखेडमध्ये आमदार रोहित पवार, भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्या गटात चुरस दिसून येत आहे. पारनेरमध्ये आमदार नीलेश लंके यांनी बिनविरोधचे आवाहन केले असले, तरी शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्या गटात संघर्ष दिसेल. श्रीगोंद्यात आमदार बबनराव पाचपुते व माजी आमदार माजी आमदार राहुल जगताप व नागवडे गटही सक्रिय आहे. राहुरीत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व माजी मंत्री शिवाजी कर्डिले, अकोल्यात माजी आमदार वैभव पिचड विरुद्ध राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेचे नेते, असे वातावरण तयार झाले आहे.  ...अशी आहे निवडणूक प्रक्रिया  निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायती ः ७४७  उमेदवारी अर्ज भरणे ः २३ डिसेंबरपासून सुरू  अर्ज मागे घेणे ः ४ जानेवारी  मतदान ः १५ जानेवारी  मतमोजणी ः १८ जानेवारी 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT