जळगाव जिल्हा परिषदेत २०० कोटींचा निधी पडून
जळगाव जिल्हा परिषदेत २०० कोटींचा निधी पडून 
मुख्य बातम्या

जळगाव जिल्हा परिषदेत २०० कोटींचा निधी पडून

टीम अॅग्रोवन

जळगाव : जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत वाद आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या निधीचे नियोजन अजूनही झालेले नाही. सुमारे २०० कोटी रुपये निधी पडून आहे. २०१८-१९ या वित्तीय वर्षात कामे मार्गी लागतील कशी, हा मुद्दा असून, त्याचा ग्रामविकासावर परिणाम होईल, असे चित्र आहे.

भजनी मंडळांसाठी साहित्य वितरण, बाकखरेदीच्या निविदा लटकल्या आहेत. याबाबत विरोधकांची न्यायालयात जाण्याची भूमिका आहे. लघुसिंचन, आरोग्य, बांधकाम, ग्रामपंचायत, पशुसंवर्धन आदी विभागांशी संबंधित योजनांसाठी निधी खर्च होत नसल्याची स्थिती आहे. फेब्रुवारीत निवडणुकांची आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे विकासकामांचे उद्‌घाटन, त्यासंबंधीचे निर्णय जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये घेणे शक्‍य होणार नाही. हे माहीत असूनही सत्ताधारी आपापसांतील मतभेद, वादामुळे कार्यवाही करीत नाहीत. विरोधकांना विश्‍वासात घेत नाहीत, असा दावा काही सदस्यांनी केला आहे.

मागील वर्षीदेखील निधीचे नियोजन रखडल्याने निधी खर्च झाला नाही. वित्त विभागाकडे फायली साचल्या. कंत्राटदारांना वणवण फिरविले जाते. जलयुक्तच्या कामांची गती नाही. ज्या योजनांना निधी नाही, त्याची ओरड सत्ताधारी करतात. मात्र, प्राप्त निधी खर्च करण्याची प्रक्रिया होत नाही. ती सुरू झाल्यानंतर किमान दोन महिने अंतिम मंजुरीला लागतील. आताच नियोजन पूर्ण करावे. जिल्हा परिषदेतील स्थायी समितीची सभा केवळ सदस्य गैरहजर असल्याने नुकतीच तहकूब करण्यात आली. अशा प्रकारांमुळे निर्णयप्रक्रिया कशी पार पडेल, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market Rate : कांदा खरेदीचा मलिदा कोण खाणार ? कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमीच

Kolhapur Farmers : कोल्हापुरातील शेतकरी राष्ट्रीय महामार्ग रोखणार, भारत पाटणकर यांचा इशारा

Crop Damage : केळी, पपईच्या नुकसानीची भरपाई द्या : शेतकऱ्यांची मागणी

Drought Condition : माथा ते पायथा जलसंधारणातून दुष्काळाच्या झळा कमी करणे शक्य

Manjra Dam : ‘मांजरा’तील गाळाच्या आकड्यांचा घोळ

SCROLL FOR NEXT