चारा छावणी
चारा छावणी  
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात एकाही तालुक्यात चारा शिल्लक नाही

टीम अॅग्रोवन

नगर  ः नगर जिल्ह्यामध्ये आता पावसाळ्याचे अडीच महिने उलटले असले तरी, अजूनही चारा उपलब्ध झाला नाही. सध्या जिल्ह्यामधील एकाही तालुक्यात चारा उपलब्ध नसल्याचा प्रशासनाचा अहवाल आहे. त्यामुळे भर पावसाळ्यातही जनावरे जगवण्याची चिंता तर कायम आहेच, पण गेल्या वर्षीचा दुष्काळ अजूनही मोडला नसल्याची चिंताही कायम आहे.  राज्याच्या अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे नगरमधील मोठ्या नद्यांना पूर आला आणि जिल्ह्यामधील काही गावांना त्याचा फटकाही बसला. मात्र काही गावांचा अपवाद वगळता अजूनही नगरमधील बहुतांश भागात जोरदार पाऊस नाही. मध्यंतरी झालेल्या अल्प पावसावर पिके तरारली, पण पिण्याच्या पाण्याची चिंता कायम आहे. गेल्या वर्षभरात ग्रामीण भागात सर्वाधिक चिंता होती ती जनावरांच्या चाऱ्याची. फेब्रुवारीतच जिल्ह्यामधील सर्व तालुक्यातील चारा संपलेला आहे. उन्हाळ्यात शासनाने छावण्या सुरू केल्यामुळे जनावरे वाचली, शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला. अजूनही चार तालुक्यांत जनावरे जगवण्यासाठी जनावरांच्या छावण्या सुरू आहेत.  मात्र गेल्या सात महिन्यांपासून जिल्ह्यामधील चारा संपलेला आहे. केवळ बाहेरच्या चाऱ्यावर आणि उसाच्या आधारावरच जनावरे जगवली जात आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर चारा उपलब्ध होत असतो. यंदा मात्र त्या तुलनेत चारा उपलब्ध झालेला नाही. प्रशासनाच्या अहवालानुसार अजून जिल्ह्यामध्ये चारा उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे सध्या कोणत्याही तालुक्यात चारा शिल्लक नाही. पिके नाहीत, पाणी नाही, जनावरांना चारा नाही, त्यामुळे नगरमधील अनेक गावांत दुष्काळ अजून कायम असल्याचे चित्र आहे. ‘‘खरिपाच्या अंतिम पेरणीचे आकडे आमच्याकडे आले आहेत. झालेल्या पेरणीतून किती चारा उपलब्ध होईल, हे नंतर कळेल. सध्या तरी कोठेही चारा उपलब्ध नाही.’’ असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT