नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफ्यावर आधारित हमीभाव देणार आहे. हा हमीभाव जाहीर करताना सरकार कृषी निविष्ठांची वास्तविक किंमत आणि कुटुंबातील सदस्यांची मजुरी विचारात घेणार आहे. या सूत्रानुसार काढलेला हमीभाव शेतकऱ्यांना २०१९ च्या खरिपापासून दिला जाईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिली. सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात २०१९ च्या खरिपापासून शेतीमालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा असा हमीभाव देण्याची घोषणा केली होती. परंतु उत्पादन खर्च कसा काढणार? मजुरीचा समावेश असेल का? त्यासाठी कोणते सूत्र वापरणार अशी विचारणा विरोधकांकडून केली जात होती. तसेच तज्ज्ञांनीही याबाबतचे सूत्र जाहीर करण्याची मागणी केली होती. राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत उत्तर देताना अर्थमंत्री जेटली यांनी ही माहिती दिली. सध्या सरकार २३ पिकांचा हमीभाव ठरविते. अर्थमंत्री म्हणाले, की हमीभाव ठरविसाठी उत्पादन खर्च काढण्यासाठी सरकार A2+FL (वास्तविक निविष्ठांचा लागलेला खर्च अधिक कुटुंबातील सदस्यांची मजुरी) सूत्र वापरणार आहे. सध्या सरकार हमीभाव ठरवत असले तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. त्यामुळे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना हमीभाव देण्याची तरतूद केली आहे. हमीभाव ठरविताना कृषी निविष्ठा खर्च आणि मजुरीचा खर्च विचारात घेताला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना A2+FL सूत्रानुसार आलेला खर्च आणि ५० टक्के नफा दिला जाणार आहे.
सध्या असा ठरतो हमीभाव
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.