कोल्हापूर पूर
कोल्हापूर पूर  
मुख्य बातम्या

कोल्हापुरात पूर परिस्थिती गंभीर

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे. पंचगंगा नदीला महापूर आला आहे. इतर नद्यांचे पाणी वेगात वाढत आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना, सांगली जिल्ह्यातील चांदोली व राधानगरी धरणांतून पाण्याचा अखंड विसर्ग सुरू असल्याने पंचगंगेसह कृष्णा, वारणा व अन्य नद्यांचे पाणी आता नागरी वस्तीत शिरू लागले आहे.  राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक ३, ४, ५ व ६ सुरू आहेत. यामधून ७११२ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणीपातळी दुपारी तीन वाजता ४४ फूट इंच होती. एकूण ८१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर ८.३४ टीएमसी पाणीसाठा आहे. कोदे लघुप्रकल्प व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. आजरा मौजे इटे (ता. आजरा) येथे केशव बाळू पाटील हे ओढ्याच्या पाण्यात वाहून गेले. पाऊस जोरदार नसला तरी नद्यांच्या काठाची शेती पाण्याखाली जात आहे. लहान उसासह खरीप पिके पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. महत्त्वाच्या धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने नद्यांचे पाणी वेगाने वाढत आहे. मोठ्या नद्यांच्या बॅकवॉटरमुळे लहान नद्यांचे पाणी पसरत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उन्हाचा चटका असह्य; राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज कायम

Water Scarcity : भूजल पातळीत घट; ३४ गावांत हातपंप बंद

Agriculture Irrigation : निळवंडेचे पाणी सोडा, अन्यथा रास्ता रोको ः आमदार तनपुरे

Crop Loan : जेवढे भरले तितकेच नव्याने पीककर्ज!

Canal Work : गोसेखुर्द कालव्याचे काम रखडले

SCROLL FOR NEXT