नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था अडचणीत आहेत. त्यामुळे एकीकडे शेतकरी उत्पन्नामुळे, तर शेतमजूर कामाच्या अस्थिरतेमुळे अडचणीत आहेत. त्यामुळे दोन्ही घटकांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी दहिवड ग्रामपंचायतीने ग्रामस्थ, शेतकरी व शेतमजूरांच्या सर्वानुमते मजुरी दर व कामाची वेळ निश्चित केला आहे. तसे ग्रामपंचायतीकडून सूचित करण्यात आले आहे.
शेतमालाला मिळत नसलेल्या दर आणि त्यातच खरीप हंगामाच्या तोंडावर वाढलेला उत्पादन खर्च या शेतकऱ्यांसमोर प्रमुख अडचणी आहेत. शेतमजुरी करणाऱ्या घटकांनाही गावाबाहेर जाऊन गुजराण करावी लागत आहे. त्यामुळे शेतमजुरांना गावातच रोजगार मिळावा हा त्यामागील मुख्य उद्देश आहे.
गावातील शेतकरी हेच प्रामुख्याने शेतमजूर आहेत. बाहेरचे मजूर आल्यास पैसा बाहेर जातो. लॉकडाऊन काळात रोजगाराच्या संधी गावातच उपलब्ध व्हाव्यात. त्यांना अडचणी असताना शासनाने कुठलीही मदत केली नाही. त्यामुळे दोन्ही घटकांचे हित साधण्यासाठी हा ठराव करण्यात आला. - आदिनाथ सूर्यवंशी, सरपंच, दहिवड, ता. देवळा
खरीप हंगामाची कामे आता वेग घेऊ लागली आहेत. त्यातच कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही वाढतो आहे. त्यामुळे खबरदारी घेऊन हे पाऊल उचलले आहे. मात्र कामाचे स्वरूप व दर निश्चित करून शेतीकामाची दिशा देण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे अडचणी कमी होतील. - संजय देवरे, शेतकरी, दहिवड, ता. देवळा
असा आहे ठराव
कामाची वेळ | सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत |
दर असे | (प्रतिव्यक्ती, रोज रुपये) |
कांदा लागवड निंदणी | २०० |
बाजरी कापणे | ३०० |
बाजरी खुडणे | २५० |
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.