Jayant Patil
Jayant Patil  
मुख्य बातम्या

अलमट्टीवर आधुनिक रियल टाइम डाटा यंत्रणा बसवा : जयंत पाटील

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : पूरपरस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटक राज्याने पाण्याची आवक-जावक, पाणीसाठा याबाबतची अलमट्टीवर डायनॅमिकल कंट्रोलसाठी आधुनिक रियल टाइम डाटा यंत्रणा बसवावी, अशी सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी बंगळूरमध्ये झालेल्या बैठकीत केली. ती कर्नाटक सरकारने मान्य केल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली. 

संभाव्य पूरस्थितीवरील उपाययोजनांबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या बंगळूर येथील निवासस्थानी ही बैठक झाली. बैठकीस राज्यातील विजय कुमार गौतम, सचिव ए. पी. कोहीरकर, सहसचिव ए. ए. कपोले, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, तर कर्नाटक राज्याचे गृहमंत्री ना. बोम्मई, मुख्य सचिव राकेश सिंग, प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद, मुख्य सल्लागार अनिल कुमार, जलसंपदा सचिन लक्ष्मणराव पेशवे, कार्यकारी संचालक मल्लिकाजुर्न गुंगे हे उपस्थित होते. 

सातारा, सांगली भागांत महापुराची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या पुढाकाराने बैठक झाली. गतवर्षी देखील राज्याच्या जलसंपदा विभागाने पाण्याचे सुव्यवस्थित नियोजन करून पूरपरिस्थिती टाळली होती. पूरपरिस्थिती पुन्हा उद्‌भवू नये, यासाठी ही भेट होत असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. 

बैठकीनंतर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले, की दोन्ही राज्यांनी येत्या पावसाळ्यात समन्वयाने पूरपरिस्थितीवर मात करण्याचे ठरले. राज्यात डायनॅमिक पद्धतीने रियल टाइम डाटा यंत्रणा उपलब्ध आहे. त्याप्रमाणे कर्नाटक राज्यानेही डायनॅमिक पद्धतीने रियल टाइम डाटा यंत्रणा बसवण्याची सूचना केली. त्यास कर्नाटकने सहमती दर्शवली आहे. यामुळे अलमट्टी धरणातील आवक-जावक यांची माहिती तातडीने दोन्ही राज्यांना मिळेल. अलमट्टीपुढील नारायणपूर येथील बंधाऱ्यापर्यंत पुराच्या पाण्यांचेही नियंत्रण करणे शक्य होणार आहे. 

विविध मुद्द्यांवर चर्चा  भीमा व कृष्णा खोऱ्यातून होणारा विसर्ग व त्याच्या माहितीचे आदान-प्रदानाची यंत्रणा, धरण व्यवस्थापन व पूर नियंत्रणाबाबत संयुक्त आराखडा व कार्यप्रणाली निश्‍चितीवर चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारने खोऱ्यातील आधुनिक यंत्रणेव्दारे रियल टाइम डाटा यंत्रणा बसवली आहे. याचा फायदा आवक-जावक यासह कोणत्या धरणातून किती पाणी सोडावे लागणार आहे याचे नियोजन करणे सोपे होईल, यावर बैठकीत चर्चा झाली.  चार टीएमसी पाणी कर्नाटकला देणार  दरम्यान, उन्हाळ्यात कर्नाटकच्या काही भागांना तीव्र पाणीटंचाई जाणवते. या भागात महाराष्ट्राकडून या कालावधीत चार टीएमसी पाणी देण्याचा निर्णय बैठकीत झाला. यासंदर्भात नियोजन करण्यासाठी तांत्रिक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT