Fishing closed in Sindhudurg district from June 1
Fishing closed in Sindhudurg district from June 1 
मुख्य बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक जूनपासून मासेमारी बंद

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात १ जूनपासून मासेमारी बंद होणार आहे. यावर्षी ६१ दिवसांकरिता ही बंदी असणार असून १ ऑगस्टपासून पुन्हा मासेमारीला सुरुवात होणार आहे. मासेमारीमुळे मत्स्यबीज धोक्यात येऊ नये, या दृष्टीने केंद्र सरकारने कायदा केला असून त्यानुसार ही कार्यवाही केली जाते. बंदी कालावधीत मासेमारी करण्याचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्र सागरी अधिनियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे मत्स्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, वेंगुर्ला या तीन तालुक्यांना समुद्रकिनारा लाभला आहे. या तालुक्यातील किनारपट्टीचे अनेक जण मत्स्य व्यवसायात आहेत. यावर्षी सातत्याने मच्छीमारांना विविध सकंटाना सामोरे जावे लागले. क्यार वादळासह समुद्रातील सतत बदलणारे वातावरण, एलईडी मासेमारीमुळे यावर्षीचा हंगाम वाया गेला. दरम्यान आता केंद्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे १ जूनपासून सर्वच ठिकाणी मासेमारी बंद होणार आहे.

त्यामुळे जिल्ह्यातही मासेमारी बंद होणार असून मच्छीमारांनी आवराआवर सुरू केली आहे. मच्छीमार नौका किनाऱ्याला आणून लावण्याचे काम सध्या मच्छीमारांकडून सुरू आहे. यावर्षी ६१ दिवस मासेमारी बंद राहणार आहे. १ ऑगस्टपासून पुन्हा मासेमारीला सुरुवात होणार आहे. जून आणि जुलै हे दोन महिने मत्स्यबीज वाढीचे असल्यामुळे या कालावधीत मासेमारी बंदी केली जाते. या कालावधीत मासेमारी सुरू राहिल्यास मत्स्यबीजाला धोका निर्माण होतो.यापूर्वी प्रत्येक राज्याचा बंदी कालावधीत वेगवेगळा होता. परंतु त्यातून अनेक प्रश्‍न निर्माण झाले होते. त्यामुळे आता एकाच कालावधीत महाराष्ट्र, गोवा, केरळ, गुजरात या राज्यांमध्ये बंदी केली जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT