लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराची सांगता
लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराची सांगता  
मुख्य बातम्या

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराची सांगता

टीम अॅग्रोवन

मुंबई: राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची सांगता मंगळवारी (ता.९) झाली. विदर्भातील सात मतदारसंघात येत्या ११ एप्रिलला मतदान होत आहे. आचारसंहितेनुसार मतदानाच्या ४८ तास आधी निवडणूक प्रचार संपतो. त्यामुळे सोमवारी संध्याकाळी पाच वाजता पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला विदर्भातून सुरवात होत आहे. पहिल्या टप्प्यात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम अशा सात मतदारसंघात निवडणूक होत आहे. येथील निवडणूक प्रचाराला मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरवात झाली होती. आता शेवटच्या टप्प्यात अधिकाधिक मतदारापर्यंत पोचण्यासाठी उमेदवार, कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. पहिल्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आदी दिग्गजांनी सभा घेऊन वातावरण ढवळून काढले. मोदींनी वर्धा आणि चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवारांसाठी सभा घेतली. मोदींनी जेथे सभा घेतली तेथेच राहुल गांधींनी काँग्रेस उमेदवारांचा प्रचार केला. शरद पवार यांनी भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी सभा घेतली. तर ठाकरे यांनी रामटेकमध्ये सभा घेऊन महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले. मोठ्या प्रचारसभांच्या माध्यमातून मतदारांना आवाहन केल्यानंतर काल प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवारांचा भर पदयात्रा, मतदारांच्या भेटीगाठी, रोडशो यावर राहिला. संध्याकाळी पाच वाजता प्रचार संपणार असल्याने पारा चढलेला असतानाही कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न राहिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT