अकोला ः अकोल्यात ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली असल्याने भाजीपाला, फळ विक्रीबाबत अडचणी वाढल्या आहेत. अशा स्थितीत शेतकरी गट कृषी विभागाची मदत घेत थेट विक्री करीत आहेत. यातून ग्राहकांना चांगला शेतमाल मिळत असून शेतकऱ्यांची अडचणही कमी होऊ लागली आहे.
शहरात थेट विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. बुधवारी (ता.आठ) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक मोहन वाघ यांच्या मार्गदर्शनात वाशिंबा येथील शेतकरी गटाच्या फळविक्री केंद्राचे उदघाटन झाले.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी अजय कुळकर्णी, तालुका कृषी अधिकारी डी. एस. प्रधान, आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार, मंडळ कृषी अधिकारी प्रदीप राऊत, कृषी सहायक मंगेश मुकुंदे यांची उपस्थिती होती.
शेतातील तयार झालेल्या मालाची वाशींबा येथील महात्मा फुले शेतकरी स्वंय सहाय्यता गटामार्फत ताजे कलिंगड थेट ग्राहकांना माफक दरात विक्री करण्यात येत आहे. या ठिकाणी ‘कोरोना’च्या अनुषंगाने प्रतिबंधक उपाययोजना करण्याबाबत गटाचे अध्यक्ष प्रमोद तायडे यांना मार्गदर्शन केले.
अकोला तालुक्यातील इतर शेतकरी गटांनी शेतातील उत्पादित मालाची विक्री करावी याबाबत शेतकऱ्यांना व शेतकरी गटांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येत आहे.
शेतकरी गटांना भाजीपाला, फळविक्री करिता परवाना देण्यात येत असून त्याकरिता (आत्मा) यंत्रणा अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी डी. एस. प्रधान यांनी दिली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.