संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सांगली जिल्ह्यात ४६०१ शेततळ्यांची कामे पूर्ण

टीम अॅग्रोवन

सांगली  ः जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी कृषी विभागाने केली आहे. या योजनेर्तंगत जिल्ह्यात तब्बल ४६०१ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या शेततळ्यांत सध्या ५७०० टीसीएमहून अधिक पाणीसाठा निर्माण झाला असून, सुमारे ३ हजार हेक्‍टरहून अधिक क्षेत्र सिंचन खाली आले आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करत कृषी विभागाने मागेल त्याला शेततळे या योजनेची प्रभावी अमंलबजावणी केली आहे. परिमाणी, जिल्ह्यात ४६०१ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये सर्वाधिक १५७३ शेततळी तासगाव तालुक्‍यात पूर्ण झाली आहे. तालुक्‍यात द्राक्षाचे मोठे क्षेत्र आहे. शेततळ्यांमुळे द्राक्ष पिकासाठी पाण्याचे योग्य नियोजन शेतकऱ्यांना करणे शक्‍य झाले आहे.

मिरज तालुक्‍यात ८९० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत तर कवठेमहांकाळ तालुक्‍यात ७९०, जत तालुक्‍यात ६४०, खानापूर तालुक्‍यात २७४ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यासाठी १९ कोटी २९ लाख रुपयांचे अनुदानही शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील ४ ६०१ शेततळ्यांत सुमारे ५७०० टीसीएमइतका पाणीसाठा झाला आहे. बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शेततळ्यांमुळे दिलासा मिळाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Kharif Review Meeting : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमा

Sharad Pawar : सध्याचे केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात: शरद पवार

Mumbai Weather : मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे

Tur Market : तुरीला मिळतोय ११ हजारांच्या पुढे भाव

PM Narendra Modi : साठ वर्षे सत्ता उपभोगली, पण शेतीपर्यंत पाणी पोहोचवले नाही

SCROLL FOR NEXT